खडसे, मुंडे भेटीवर अजित पवारांची प्रतिक्रिया
नागपूर, 3 जून : पंकजा मुंडे या भाजपवर नाराज आहेत. त्यांनी अनेकदा आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. आज राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अर्धातास बंद दाराआड चर्चा झाली. या भेटीनंतर चर्चेला उधाण आलं आहे. या भेटीवर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं काय म्हटलं अजित पवारांनी? पंकजा मुंडे यांचा तो पक्षांतर्गत प्रश्न आहे, त्यावर बोलनं योग्य होणार नाही. मुंडे आणि खडसे यांनी अनेक वर्ष एकाच पक्षात काम केलं आहे. खडसे मुंडेसाहेबांना मानतात असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. पंकजा मुंडे काय म्हणाल्या? दरम्यान या भेटीवर पंकजा मुंडे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मुंडे साहेबांचं जीवन वादळी होतं आणि मी वादळाची लेक आहे. आता इथे वादळ येणार होतं त्याचं डायरेक्शन बदललं आहे, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. त्यामुळे नेमकी वादळाची दिशा कोणी बदलली असा प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित होत आहे. एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांच्या चर्चेनंतर वादळाची दिशा बदलली का? असा देखील सूर राजकीय वर्तुळातून काढला जात आहे.
नाथाभाऊंनी वादळाची दिशा बदलली? खडसेंच्या भेटीनंतर पंकजांचं मोठं वक्तव्य; आज भूमिका मांडणारपुढे बोलताना पंकजा मुंडे यांनी म्हटलं की, तीन जून हा दिवस माझ्यासाठी खूप भावनिक आहे. मी आज कोणत्याही राजकीय नेत्याला इथो निमंत्रीत केलं नव्हतं. मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या निष्पाप लोकांनी हा कार्यक्रम ठेवला आहे. नाथाभाऊ यांचं मुंडेसाहेबांवर प्रेम आहे. म्हणून नाथाभाऊ भेटीसाठी आले. ते कोरोना काळात येऊ शकले नव्हेत. ते मुंडेसाहेबांचे सहकारी होते, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. मी जे काही बोलेल ते आज तीन वाजता बोलेल असंही पकंजा मुंडे यांनी म्हटलं आहे.