मुंबई, 16 डिसेंबर : घरामध्ये झाड लावणे चांगले आणि फायदेशीर आहे. झाडे लावल्याने घरातील वातावरण शुद्ध राहते आणि सकारात्मक वातावरण राहते. हिंदू धर्मग्रंथांमध्ये काही झाडे पवित्र मानली गेली आहेत. तुळशी , शमी, केळी ही अशी झाडे आहेत, ती घरात लावल्याने सुख-समृद्धी येते. परंतु, काही झाडे अशुभ असतात. ही रोपे लावल्याने घरात सुख-शांती येत नाही. शास्त्रात अशी झाडे घरात लावायला मनाई आहे. चला जाणून घेऊया घरात कोणती झाडे लावणे अशुभ आहे .
अघोरींबद्दलच्या गोष्टी: कच्चे मानवी मांस खाण्यापासून ते प्रेताशी शारीरिक संबंधांपर्यंतकापूस
कापसाचे रोप दिसायला सुंदर असले तरी ते घरी कधीही लावू नये. वास्तुशास्त्रात कापसाच्या रोपाला अशुभ सांगितले आहे, ते घरात लावल्याने नकारात्मक ऊर्जा येते आणि घरात तणावाचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे घरामध्ये कापसाचे रोप लावू नये.
चिंच
चिंचेची चव जेवणात चांगली असली तरी चिंचेचे रोप जीवनात समस्या बनू शकते. चिंचेच्या रोपामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते. ज्यामुळे घरातील सुख-समृद्धी जाऊ शकते. चिंचेचे रोप घराजवळ असेल तर ते काढून टाकावे.
घराच्या देव्हाऱ्यातून ताबडतोब काढून टाका या गोष्टी, अन्यथा होऊ शकते नुकसान!बाभूळ वनस्पती
वास्तूनुसार बाभूळ वनस्पतीदेखील शुभ नाही. ती घरी किंवा जवळपास लावू नये. वास्तुशास्त्रानुसार घरातील बाभळीच्या रोपामुळे भांडणे होतात. त्यामुळे अनेकदा कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडणे होतात. बाभळीच्या रोपामुळे घरात दारिद्र्य येते. म्हणूनच घरामध्ये बाभळीचे रोप लावू नये.
मेंदी वनस्पती
वास्तुशास्त्रानुसार मेंदीच्या रोपामध्ये वाईट शक्तींचा वास असतो. म्हणूनच मेंदीचे रोप घरात लावू नये, याचा परिणाम कुटुंबातील सदस्यांवर वाईट शक्तींचा होतो. मेंदीचे रोप घरातील नकारात्मक शक्तींवर वर्चस्व गाजवायला लागते, त्यामुळे मेंदीचे रोप घरामध्ये किंवा आजूबाजूला लावू नये.
मग पुढच्या वेळी घरी झाडे लावण्याआधी वरील वास्तू टिप्स नक्की लक्षात घ्या आणि मगच ती रोपं घरात लावा.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)