मुंबईत कोणाचा महापौर?
मुंबई, 23 मे : आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाले आहेत. जयंत पाटील यांना आलेल्या ईडीच्या नोटीसीनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगलं आहे. अखेर जयंत पाटील यांच्या ईडी नोटीसीवर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जंयत पाटील यांना ईडीने नेमकी कोणत्या प्रकरणात नोटीस पाठवली? ती का आणि कशासाठी पाठवण्यात आली, याबद्दल माहित नाही, ज्यावेळी ईडी याबाबत खुलासा करेल तेव्हाच प्रकरण समोर येईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तसेच त्यांनी यावेळी मुंबई महापालिका निवडणुकीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं काय म्हटलं शंभूराज देसाई यांनी? जयंत पाटील यांच्य ईडीनोटीसवर अखेर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. शंभूराज देसाई यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जंयत पाटील यांना ईडीने नेमकी कोणत्या प्रकरणात नोटीस पाठवली? ती का आणि कशासाठी पाठवण्यात आली, याबद्दल माहित नाही, ज्यावेळी ईडी याबाबत खुलासा करेल तेव्हाच प्रकरण समोर येईल. तपास यंत्रणा या सगळ्या स्वायत्त आहेत, त्यामुळे त्या कोणाच्या दडपानाखाली कारवाया करण्याचा प्रश्नच नसल्याचं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. संजय राऊतांवर निशाणा दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला आहे. संजय राऊत हे पोपट आहेत. ते दरवेळी नवनवीन चिठ्ठ्या काढत आहेत. मात्र प्रत्येकवेळी चुकीची चिठ्ठी निघत असल्याने त्यांचा मालकही त्यांना कटांळला असल्याचा टोला शंभूराज देसाई यांना लगावला आहे.
मुंबईत कोणाचा महापौर? यावेळी त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई महापालिकेत युतीची सत्ता आल्यास कोणाचा महापौर बसणार असा प्रश्न विचारला असता याबाबत शिंदे, फडणवीस हे निर्णय घेतील असं त्यांनी म्हटलं आहे.