कोल्हापूर, 22 जुलै: कोल्हापुरात **(Kolhapur)**पावसानं धुमशान घातलं आहे. जिल्ह्यात (Kolhapur Rain) मुसळधार पाऊस सुरुच आहे. बुधवारी जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. आताही पावसाची परिस्थिती जैसे थेच आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 36 फुटांपर्यंत पोहोचली आहे. तर जिल्ह्यातले तब्बल 77 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. (Heavy Rainfall In Kolhapur) जिल्ह्याला पुराचा धोका जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी 36 फुटांवर पोहोचली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पुण्याहून कोल्हापूर कडे NDRF दोन तुकड्या रवाना झाल्या आहेत.
जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. अशातच कोल्हापूर गगनबावडा मार्गावर पुराचं पाणी आलं असून कोल्हापूर गगनबावडा मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसंच मांडुकली येथं कुंभी नदीचं दोन फूट पाणी रस्त्यावर आलं आहे. त्यातच धोक्याची पाणी पातळी गाठण्यासाठी पंचगंगा नदीत 4 फूट पाणी कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यात असाच पाऊस राहिल्यास पंचगंगा नदी लवकरच धोक्याची पातळी ओलांडेल. 39 फूट ही पंचगंगा नदीची इशारा पातळी असून सध्या नदीची पातळी 36 फूट आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, गगनबावडा तालुक्यांमध्ये रात्रभर अतिवृष्टी झाली आहे. बर्की गावात जाणाऱ्या पुलावर पाणी आल्यानं बर्की गावचा संपर्क तुटला आहे.
शाहुवाडी तालुक्यातील गेळवडे धरणातील पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. कासारी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. कुंभी धरणातून एकूण 780 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु असून किरवे येथे कोल्हापूर गगनबावडा रस्तावर पाणी आल्यानं रस्ता बंद झाला आहे.
जिल्ह्यातील हे मार्ग बंद गडहिंग्लज तालुक्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. नीलजी आणि ऐनापूर हे दोन बंधाऱ्यावर पाणी आल्यानं वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत. त्यातच गडहिंग्लज- चंदगड राजमार्गावर दुपारपर्यंत पाणी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यातच कोल्हापूर- रत्नागिरी महामार्ग बंद करण्यात आला आहे. मलकापूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर येल्लुर गावाजवळ 2 फूट पाणी आल्यानं प्रशासनानं महामार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.