नवी दिल्ली, 16 मे : कोरोनाच्या व्हायरसच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेमुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या स्थिती काहीशी सुधारत असून मृतांचा आकडाही कमी झाला आहे. यादरम्यान आधार कार्ड (Aadhaar card) किंवा आयुष्मान कार्ड नसणं रुग्णांसाठी समस्या ठरत आहे. अशात यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) देशातील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. UIDAI ने, केवळ आधार कार्ड नसल्याने कोणत्याही नागरिकाला उपचार नाकारता येणार नाही. तसंच लसीकरणासाठीही (Corona Vaccination) आधार कार्ड अनिवार्य नसल्याचं, स्पष्ट करण्यात आलं आहे. UIDAI ने स्पष्ट केलं, की कोरोना वॅक्सिन घेण्यासाठी, औषधं घेण्यासाठी, तसंच रुग्णालयात भरती होण्यासाठी आधार कार्ड असण्याची अनिवार्यता संपवण्यात आली आहे. त्यामुळे इलाज करण्यासाठी, उपचार घेण्यासाठी केवळ आधार कार्ड नाही, म्हणून कोणीही नकार देऊ शकत नाही. आवश्यक सेवा मिळवण्यासाठी आता आधार अनिवार्य असणार नाही. आधार कार्ड नसल्याने अनेकांना रुग्णालयात भरती करुन घेण्यासाठी नकार दिला जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मेडिकल इमरजेंसी केसेसमध्ये अनेकांकडे आधार कार्ड तर असतं, पण घाईगडबडीत ते आणण्यासाठी विसरतात. त्यामुळे कार्ड नसणं ही बाब रुग्णांसाठी भारी पडते.
#UIDAI
— Aadhaar (@UIDAI) May 16, 2021
NO one shall be denied vaccine, medicine, hospitalization, or treatment for want of #Aadhaar #Unite2FightCorona pic.twitter.com/22tE96tlLE
(वाचा - आता 84 दिवसांनंतरच मिळणार Covishield चा दुसरा डोस, CoWIN पोर्टलमध्येही होणार बदल )
सरकारी रुग्णालयात भरती न केल्यामुळे, त्यानंतर प्रायव्हेट रुग्णालयात महागडे उपचार करणं सर्वानांच आर्थितदृष्ट्या परवडणारं नसतं. त्यामुळे UIDAI कडून देण्यात आलेला हा निर्णय मोठा दिलासा ठरत आहे. तसंच वॅक्सिनेशन सेंटर्सवरही आधार कार्ड नसल्याने अनेकांना पुन्हा घरी यावं लागतं. यासाठीही आता आधार कार्ड नसण्याचा अडसर होणार नसल्याचं UIDAI कडून स्पष्ट करण्यात आलं आहे.