नवी दिल्ली, 22 मार्च: आयसीसी महिला विश्वचषकच्या (Women’s World Cup 2022) 22 व्या सामन्यात भारतीय महिलांनी बांगलादेश महिला संघाचा (IND W vs BAN W) 110 धावांनी धुव्वा उडवला आणि आपल्या सेमीफायनल खेळण्याच्या आशा पल्लवित ठेवल्या. टीम इंडियाने दिलेल्या 230 धावांच्या प्रत्युत्तरात बांगलादेश संघ 40.3 षटकांत 119 धावाच करू शकला, परिणामी मिताली ब्रिगेडने स्पर्धेत आपला तिसरा विजय नोंदवला. भारताच्या या विजयात यास्तिका भाटियाने (Yastika Bhatia) फलंदाजी आणि गोलंदाजांनी विशेषतः स्नेह राणा (Sneh Rana) हिने महत्वपूर्ण भूमिका बजावली. यास्तिकाने बॅटने सर्वाधिक 50 धावा केल्या तर स्नेह राणा हिने चार विकेट घेतल्या. भारताकडून यास्तिका भाटियाने अर्धशतक झळकावले. यास्तिकाने 79 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. जे तिचे या स्पर्धेतील सलग दुसरे अर्धशतक होते. डावाच्या 43व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर त्याने एकच धाव घेतली आणि वैयक्तिक धावसंख्या 50 वर आणली. मात्र, पुढच्याच चेंडूवर ऋतु मोनीने तिला नाहिदा अख्तर करवी झेलबाद केले.
यास्तिकाने 80 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. बांगलादेशची मध्यमगती गोलंदाज ऋतु मोनीने अप्रतिम कामगिरी करत अवघ्या 37 धावांत 3 बळी घेतले. त्याच्याशिवाय नाहिदा अख्तरला 2 आणि जहांआरा आलमला 1 बळी मिळाला.
A magnificent win for #TeamIndia 🙌
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 22, 2022
They beat Bangladesh by 110 runs to keep their semi-finals qualification hopes alive. #CWC22 pic.twitter.com/WiVq4VNyNW
भारताने आज सकाळी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय भारतीय सलामीवीरांनी सार्थ ठरवला. स्मृती मानधना 30 आणि शेफाली वर्मा 42 या दोघींनी 74 धावांची सलामी दिली. त्यानंतर आलेल्या यास्तिका भाटियाने अर्धशतकी खेळी केली. अखेरच्या षटकांमध्ये पूजा वस्त्राकर 30 आणि स्नेह राणाच्या 27 फटकेबाजीच्या जोरावर भारतीय संघ दुबळ्या बांगलादेशसमोर केवळ 229 धावा उभारु शकला. भारताच्या मधळ्या फळीने आज निराशा केली. कर्णधार मिताली राज भोपळादेखील फोडू शकली नाही. तर भरवशाची फलंदाज हरमनप्रीत कौर 14 धावांचं योगदान देऊ शकली. IPL2022: ‘ती परत येतेय’…2 वर्षांनी पुन्हा क्रिकेटच्या मैदानात दिसणार दरम्यान, 230 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेशकडून सलमा खातून 32 आणि लता मोंडल 24 या दोघींनी भारतीय गोलंदाजीचा काही वेळ सामना केला. उर्वरीत कोणत्याही बांगलादेशी फलंदाजाला 20 हून अधिक धावा करता आल्या नाहीत. 7 बांगलादेशी फलंदाज दुहेरी धावसंख्या देखूल गाठू शकले नाहीत. भारतीय गोलंदाजांनी अवघ्या 119 धावांत बांगलादेशचा धुव्वा उडवला. भारताकडून या डावात स्नेह राणाने सर्वाधिक 4 बळी घेतले. तर पूजा वस्त्राकर आणि झूलन गोस्वामीने दोन फलंदाज बाद केले. राजेश्वरी गायकवाड आणि पूनम यादवला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

)







