मुंबई, 22 एप्रिल : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) क्रिकेटचा देव असं समजलं जातं. सचिननं त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये अनेक अविस्मरणीय इनिंग खेळल्या आहेत. आजच्याच दिवशी (On This Day) 24 वर्षांपूर्वी सचिननं ऑस्ट्रेलिया विरूद्ध कधीही न विसरता येणारं शतक झळकावलं होतं. क्रिकेटच्या इतिहासात 'डेझर्ट स्ट्रॉम' म्हणून ती खेळी प्रसिद्ध आहे. या लढतीत सचिनच्या वादळात बलाढ्य समजली जाणारी ऑस्ट्रेलियन बॉलिंग हतबल ठरली होती.
सन 1998 साली शारजाहमध्ये कोका कोला कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या तिरंगी स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन टीम सहभागी झाल्या होत्या. या सीरिजमधील सहावा सामना भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला. . भारताला फायनलमध्ये जाण्यासाठी ऑस्ट्रेलियावर विजय किंवा न्यूझीलंडचा रन-रटे पार करणे या दोनपैकी एका गोष्टीची गरज होती. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टीव्ह वॉ (Steve Waugh) नं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग घेतली. मायकल बेवन (101) आणि मार्क वॉ (81) या दोघांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियानं भारतासमोर विजयासाठी 285 रनचं लक्ष्य ठेवलं.
भारताला ती मॅच जिंकण्यासाठी 285 तर फायनलमध्ये जाण्यासाठी 254 रनची गरज होती. सचिननं आक्रमक सुरुवात केली. पण सौरव गांगुली (Sourav Ganguly) झटपट आऊट झाला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या नयन मोंगियानं सचिनला साथ दिली. त्या दोघांनी भारताचा स्कोअर 100 च्या पुढं नेला.
सचिननं 57 बॉलमध्येच अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर अचानक पडझड सुरु झाली. सुरुवातीला नयन मोंगिया 35 रन काढून आऊट झाला. त्यापाठोपाठ अझहरुद्दीन आणि अजय जडेजा देखील झटपट परतले. भारताची अवस्था 4 आऊट 143 अशी असताना शारजातील वाळवंटात वाळूचं वादळ आलं. त्यामुळे मॅच थांबवावी लागली.
IPL 2022 : धोनीनं 3 वर्षांनी केली इतिहासाची पुनरावृत्ती, रोहितला नडली गंभीर चूक
सचिनचं Desert Storm
वाळूच्या वादळानंतर मॅचमधील समीकरण बदललं. आता भारताला मॅच जिंकण्यासाठी 46 ओव्हरमध्ये 276 हे नवं लक्ष्य मिळालं. तर फायनलला जाण्यासाठी 46 ओव्हरमध्ये 237 रन करणे आवश्यक होते. सचिनसाठी पहिल्यापेक्षा अवघड परिस्थिती होती. पण त्यामुळे तो डगमगला नाही.
शारजातील वाळूचं वादळ थांबलं असलं तरी सचिनच्या बॅटमधून वादळ सुरु झालं होतं. त्यानं मैदानाच्या चारही बाजूनं फटकेबाजी केली. ऑस्ट्रेलियाच्या सर्वच बॉलर्सची धुलाई करत 43 व्या ओव्हरमध्येच भारताची फायनलमधील जागा निश्चित केली.
IPL 2022 : शेवटच्या ओव्हरमध्ये दिसली धोनीच्या पॉवर! थरारक विजयानंतर जडेजा नतमस्तक, VIDEO
सचिन 43 व्या ओव्हरमध्ये आऊट झाला. तोपर्यंत त्यानं 131 बॉलमध्ये 143 रन केले होते. सचिन आऊट झाल्यानंतर भारताला विजयासाठी 18 बॉलमध्ये 34 रनची आवश्यकता होती. उर्वरित बॅट्समन्सना ते लक्ष्य पूर्ण करता आलं नाही. भारताचा 26 रननं पराभव झाला. पण, सचिनच्या आक्रमक शतकामुळे भारतानं फायनलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर दोन दिवसांनी 24 एप्रिल रोजी सचिनच्या वाढदिवशी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करत कोका-कोला कप स्पर्धेचं विजेतेपदही पटकावलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Australia, Cricket news, On this Day, Sachin tendulkar