उत्तर प्रदेशातील बेरोजगारीचे प्रमाण वाढत चालल्याचं शरद पवार म्हणाले. इथल्या तरुणांवर महाराष्ट्रासह दुसऱ्या राज्यांमध्ये जाण्याची वेळ आली आहे. भाजप सरकारच्या योजनांमुळे जनता त्रासली आहे. त्यामुळे आता त्यांच्या हातातून राज्ये निसटत चालली आहेत. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री यांनी प्रचार करूनही दिल्ली भाजपला जिंकता आली नाही. केजरीवालांसमोर त्यांचा निभाव लागला नाही असं शरद पवार म्हणाले. भाजपकडून फोडा आणि राज्य करा नीती वापरली जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. आता जनतेला त्यांचे डाव समजले आहेत. त्यांच्या बोलण्यात लोक अडकणार नाहीत. सीएए आणि एनआरसीमध्ये अनेक त्रुटी आहेत. यात अल्पसंख्यांक असलेल्या मुस्लिमांकडे दुर्लक्ष केल्याचंही शरद पवार यांनी सांगितले. वाचा : 'भाजप आमदारासह 7 जणांनी बलात्कार केला', महिलेच्या आरोपानंतर गुन्हा दाखलNCP Chief Sharad Pawar in Lucknow: Aap jaise Ram Mandir banane ke liye Trust bana sakte hain, masjid banane ke liye Trust kyun nahi bana sakte? Desh to sabka hai, sabhi ke liye hai. pic.twitter.com/kfxloeYP3v
— ANI UP (@ANINewsUP) February 19, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ayodhya, NCP, Sharad pawar