मुंबई, 11 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी आगामी पाच राज्यांच्या निवडणुकांसोबतच (upcoming 5 state assembly election 2022) इतरही मुद्यांवर भाष्य केलं आहे. या पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, नवाब मलिक आणि इतर नेतेही उपस्थित होते. या पत्रकार परिषदेपूर्वी उत्तरप्रदेशातील काँग्रेस अल्पसंख्यांक चेहरा म्हणून ओळख असलेले सिराज मेहंदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सिराज मेहंदी सोबत 13 आमदार राष्ट्रवादीत येणार आहेत. स्वामीप्रसाद मौर्य यांनी भाजपला रामराम केला त्यांच्यापासून सुरुवात झाली. येत्या दिवसात भाजपला अजून फटका बसेल असं वक्तव्य शरद पवारांनी केलं आहे. (NCP will contest 3 states assembly election said Sharad Pawar) तीन राज्यांत निवडणूक लढणार शरद पवारांनी म्हटलं, आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत एकूण तीन राज्यांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभाग घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. उत्तरप्रदेशात भाजपचं सरकार हटवण्याची गरज आहे. उत्तरप्रदेशात परिवर्तन होणार असून नागरिकांना बदल हवाय. याकरिता सिराज मेहंदी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला आहे. येत्या दिवसात त्यांचे अनेक सहयोगी राष्ट्रवादीत येणार आहेत. असंही शरद पवार म्हणाले. उत्तरप्रदेशात सपा-राष्ट्रवादी आघाडी उत्तरप्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टी एकत्र निवडणूक लढणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच उत्तरप्रदेशात जाणार असल्याचंही यावेळी शरद पवारांनी सांगितलं आहे. तसेच एकत्र बैठकीत जागा वाटप धोरण ठरणार असल्याचं शरद पवार म्हणाले. वाचा : उत्तरप्रदेश निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा झटका, योगी सरकारमधील बड्या मंत्र्याचा राजीनामा मणिपूर-गोव्यात काँग्रेससोबत आघाडी मणिपूरमध्ये पाच जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढणार आहे. मणिपूर राज्यात काँग्रेससोबत बोलणी सुरू आहे. तसेच गोव्यातही काँग्रेस पक्षासोबत आणि तृणमूल काँग्रेस पक्षांसोबत चर्चा सुरू आहे. गोव्यात परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे. भाजपचं गोव्यातून सरकार हटवण्याची गरज आहे. येत्या दोन दिवसांत आघाडीचा निर्णय होईल असंही शरद पवारांनी म्हटलं आहे. अयोध्येतील राम मंदिराचा निर्णय हा कोर्टाच्या निकालानुसार आहे. हा निर्णय सगळ्यांनी स्वीकारला आहे. आता मथुरा, काशी यांचा उल्लेख हे वातावरण ढवळण्याचं, कलुषित करण्याचं काम करतायत. लोकांना हे समजतं असंही शरद पवारांनी म्हटलं आहे. राम कदम यांच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले… मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांना स्वत:चा चार्ज दिला आहे का? असा सवाल राम कदम यांनी विचारला होता यावर शरद पवारांना विचारले असता त्यांनी म्हटलं, मुख्यमंत्री हेच महाराष्ट्राचे निर्णय घेतात. त्यांची प्रकृती ठीक नसल्यानं या चर्चा होतात. एसटी कर्मचारी अजूनही संपावर ठाम हा त्यांचा अधिकार आहे. मला असं वाटतं की त्यांनी सरकार आणि कोर्टवर विश्वास ठेवावा. देशातील 5 राज्याच्या निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका सुद्धा यावेळी शरद पवार काय भाष्य करतात? कुठल्या राज्यात निवडणूक लढवतात आणि कुठल्या पक्षासोबत आघाडी करतात यासंदर्भात शरद पवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. अखेर यावर शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.