मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'काका जरा जपून...मध्यप्रदेशातील भूकंपाचे हादरे महाराष्ट्रात?'

'काका जरा जपून...मध्यप्रदेशातील भूकंपाचे हादरे महाराष्ट्रात?'

Mumbai: Senior Congress leader Mallikarjun Kharge, NCP chief Sharad Pawar and Shiv Sena President Uddhav Thackeray along with NCP, Congress and Shiv Sena MLAs during a gathering to display their strength of 162, at Grand Hyatt Hotel in Mumbai, Monday, Nov. 25, 2019. (PTI Photo/Mitesh Bhuvad) (PTI11_25_2019_000248B)

Mumbai: Senior Congress leader Mallikarjun Kharge, NCP chief Sharad Pawar and Shiv Sena President Uddhav Thackeray along with NCP, Congress and Shiv Sena MLAs during a gathering to display their strength of 162, at Grand Hyatt Hotel in Mumbai, Monday, Nov. 25, 2019. (PTI Photo/Mitesh Bhuvad) (PTI11_25_2019_000248B)

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थापन झाल्यापासूनच राज्यात कुरबुरी सुरू आहेत. त्यात आता वाढ होत आहे.

मुंबई 10 मार्च : मध्यप्रदेशातलं काँग्रेसचं सरकार संकटात सापडलं आहे. पक्षाला मोठं खिंडार पडलं असून ज्योतिरादित्य शिंदे यांच्या 20 समर्थक आमदारांनी राजीनामे दिलेत तर 6 मंत्र्यांची मुख्यमंत्री कमलनाथ यांनी हकालपट्टी केली आहे. शिंदे हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. काँग्रेसमधल्या असंतोषाचा फायदा भाजपने घेतला असून त्याचे पडसाद इतर राज्यांमध्येही उमटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. मध्यप्रदेशातल्या भूकंपाचे धक्के महाराष्ट्रात जाणवणार का? काका जरा जपून...असं ट्वीट केलंय. त्यामुळे राज्यातल्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थापन झाल्यापासूनच राज्यात कुरबुरी सुरू आहेत. महाविकास आघाडीचं सरकार येण्यापूर्वी अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत 80 तासांचं सरकार स्थापन केलं होतं. त्यानंतर अजित पवारांचं बंड शरद पवारांच्या प्रयत्नांमुळे शांत झालं. शरद पवारांनीच अशक्य वाटणारं हे सरकार आणलं असं श्रेय दिलं गेलं. आता मध्यप्रदेशातल्या घटनेमुळे राज्यातल्या महाविकास आघाडीच्या सरकारमधले मतभेद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

हे वाचा - अजबच 'शिमगा'... घोड्यावरून नाही, गाढवावरून काढली जाते जावयाची मिरवणूक

दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्याचा राज्य सरकारवर काहीही परिणाम होणार नाही अशी शक्यता व्यक्त केली. तर माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण यांनी हा पक्षाला मोठा धक्का असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, ज्योतिरादित्य शिंदे यांचा राजीनामा हा पक्षासाठी नि:संशय मोठा धक्का आहे. त्यामुळं पक्षाचं नुकसान होणार आहे. ते टाळता आलं असतं का मला माहीत नाही.

‘कोरोना’चा असाही धसका, साखरपुड्यासाठी गेलेला तरुण लग्नच उरकून आला

‘कोरोना’चा फटका, राज्यातल्या सरकारी डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

First published:

Tags: Sharad pawar