मराठी बातम्या /बातम्या /मनी /Union Budget 2023 : यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा कोणत्या?

Union Budget 2023 : यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा कोणत्या?

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय?

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय?

यंदाच्या अर्थसंकल्पात त्यांनी सात महत्त्वाच्या घोषणा केल्या आहे. त्या काय आहेत, हे जाणून घेऊयात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • New Delhi, India

नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प 2023 सादर करत आहेत. अर्थमंत्री म्हणून त्यांचा हा सलग पाचवा अर्थसंकल्प आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात त्यांनी सात महत्त्वाच्या घोषणा केल्या आहे. त्या काय आहेत, हे जाणून घेऊयात.

अर्थसंकल्पात 7 प्राधान्यक्रमांचा अवलंब करण्यात आला आहे जे आपल्याला अमृत कालचे मार्गदर्शन करतील.

1. सर्वसमावेशक विकास

2. शेवटच्या मैलापर्यंत पोहोचणे

3. पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक

4. क्षमता मुक्त करणे

5. हिरवी वाढ

6. युवा शक्ती

7. वित्त क्षेत्र

शेतीसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा निर्माण करणार, अशी घोषणाही अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात केली. तसेच पर्यटन क्षेत्राला अधिक चालना देण्यासाठी प्रयत्न करणार, सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर उपाय केले जाणार आहेत. यासोबतच कोविन, युपीआयचे जागतिक स्तरावर भारताचे स्थान मजबूत करण्यास लाभ होणार आहे.

हेही वाचा - 2023 च्या अर्थसंकल्पापूर्वी सरकारची बंपर कमाई, तिजोरीत आलेली रक्कम पाहून थक्क व्हाल!

तसेच 81 लाख महिला बचतगटांचे सबलीकरण करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. तसेच गरीब जनतेला एक वर्ष मोफत धान्य देण्यात येणार आहे. भरड धान्यासाठी हब तयार करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. या भरड धान्याला "श्री अन्न' नाव देण्यात येणार आहे.

तर 2516 कोटी रुपयांची गुंतवणूक करून देशभरात प्राथमिक सहकारी संस्था स्थापन करून साठवणुकीचे विकेंद्रीकरण करण्यात येणार आहे. शेतीसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा निर्माण करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. अन्नधान्य उत्पादन वाढवण्यासाठी कसून प्रयत्न करणार आहेत. यासाठी देशातील शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उभारणार आणि अन्नसाठवण विकेंद्रीकरण प्रक्रियेवर भर देणार असल्याचे त्या म्हणाल्या.

हेही वाचा -  Union Budget 2023 : बजेटसाठी 14 हजार 400 मिनिटांसाठी कैद, घर आणि कुटुंबापासून दूर होतात ही लोक

सरकार हरित शेती, हरित ऊर्जा यावर विशेष भर देत आहे. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरात वाढ होईल, असे त्या म्हणाल्या. तसेच फलोत्पादनासाठी 2,200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर कृषी क्रेडिट कार्ड 20 लाख कोटींनी वाढणार आहे, असे त्या म्हणाल्या. याबरोबरच पंतप्रधान मत्स्य योजनेसाठी 6,000 कोटींचा निधी, तर कृषी स्टार्टअपसाठीही निधी दिला जाणार असल्याचे त्या म्हणाल्या.

First published:

Tags: Budget 2023, Farmer, Money, Nirmala Sitharaman, Union Budget 2023