मुंबई, 11 फेब्रुवारी : ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आहे. हे पत्र राऊत यांनी पत्रकार वारीशे यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर लिहिलं आहे. या पत्रामधून संजय राऊत यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळकांसारखे ज्वलंत- निर्भीड पत्रकार ज्या कोकणच्या भूमीत जन्मास आले, त्याच भूमीत एका पत्रकाराची हत्या होणे धक्कादायक असल्याचं या पत्रात संजय राऊत यांनी म्हटलं आहे. नेमकं काय म्हटलं संजय राऊत यांनी? संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.’ ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळकांसारखे ज्वलंत- निर्भीड पत्रकार ज्या कोकणच्या भूमीत जन्मास आले त्याच भूमीत एका पत्रकाराची हत्या होणे धक्कादायक आहे. याआधी विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी ‘ईडी’ ‘सीबीआय’ व पोलीस यंत्रणेचा वापर होत असे, पण आता विरोधकांच्या हत्याच होऊ लागल्या हे चिंताजनक आहे’.
मा.गृहमंत्री
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 11, 2023
महाराष्ट्रात हे काय सुरू आहे? pic.twitter.com/AlpM1U4Twh
समांतर न्यायालयीन चौकशीची मागणी ‘कोकणात याआधी श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, अंकुश राणे, रमेश गोवेकर अशा राजकीय हत्या झाल्या व राजकीय दबावामुळे मूळ आरोपी मोकाट राहिले. त्याच खुनी मालिकेत शशिकांत वारीशे यांचे हौतात्म्य जोडले आहे. हे मी आपल्याकडे नमूद करू इच्छितो. वारीशे यांच्या हत्येचा निषेध मुंबई, दिल्लीसह जगभरातील पत्रकार संघटनांनी केला आहे. पण कोकणातील इतर खुनांप्रमाणे हे प्रकरण दडपले जाईल, अशी भीती असल्यानेच या खुनाची समांतर न्यायालयीन चौकशी व्हावी तसेच शशिकांत वारीशे यांच्या कुटुंबीयांना किमान 50 लाखांचे अर्थसहाय्य करावे अशी विनंती मी करत आहे’, अशी मागणी संजय राऊत यांनी या पत्रातून केली आहे.