मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शेतकऱ्यांनो, पुढील आठवड्यात 'या' पद्धतीनं घ्या पिकांची काळजी, वाचा कृषी विभागाचा सल्ला

शेतकऱ्यांनो, पुढील आठवड्यात 'या' पद्धतीनं घ्या पिकांची काळजी, वाचा कृषी विभागाचा सल्ला

कोल्हापूरच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राकडून शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला देण्यात आला आहे.

कोल्हापूरच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राकडून शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला देण्यात आला आहे.

कोल्हापूरच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राकडून शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला देण्यात आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India

    साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी

    कोल्हापूर, 25 मार्च :  शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीनं काळजी घेतली तर त्यांना नक्कीच चांगले उत्पन्न मिळेल.  शेतीतील पीक उत्तम पद्धतीने टिकवण्यासाठी शेतीची पुरेपूर काळजी घेणे गरजेचे असते. त्यामुळेच शेतकऱ्यासाठी कोल्हापूरच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राकडून पुढील काही दिवसांचा हवामान अंदाज वर्तवण्यात येतो.

    कसं असेल हवामान ?

    केंद्राला प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यामध्ये दिनांक 25 ते 26 मार्च दरम्यान आकाश स्वच्छ तर 27, 28 आणि 29 रोजी ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

    कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान 34° ते 35° सेल्सिअस, सांगली जिल्ह्यात कमाल तापमान 33° ते 35° सेल्सिअस आणि सातारा जिल्ह्यामध्ये कमाल तापमान 34° ते 35° सेल्सिअस दरम्यान तर किमान तापमान अनुक्रमे 19° ते 20°, 16° ते 18° आणि 16° ते 17° सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यामध्ये अनुक्रमे वाऱ्याचा वेग ताशी 13 किमी पर्यंत, 12 ते 16 किमी आणि 9.7 ते 13.8 कि.मी. दरम्यान राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. दरम्यान विस्तारित श्रेणीच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रामध्ये दिनांक २९ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान पावसाचे प्रमाण सरासरी दरम्यान तसेच कमाल आणि किमान तापमान सरासरी पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

    'या' पिकांची घ्या काळजी..

    गहू - गहू बियाणे साठवणुकीच्या काळात साँडेकिडीच्या नियंत्रणासाठी उन्हात वाळवलेल्या बियाण्यास प्रती किलो 10 ग्रॅम याप्रमाणे वेखंड भुकटीची बीज प्रक्रिया करावी. पक्व झालेल्या गहू पिकाची स्वरित काढणी आणि मळणी करून घ्यावी मळणी करून तयार झालेला शेती माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा.

    नववीतल्या ज्ञानेश्वरनं तयार केली बंदूक, पाहा कसं होणार पिकांचं संरक्षण, Video

    मका - पक्व मका पिकाची काढणी करावी, काढणी केलेली कणसे उन्हामध्ये वाळवावीत. त्यानंतर मळणी करून तयार झालेला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा.

    ऊस - (शाखीय वाढीची अवस्था असलेल्या उसाला) 6 ते 8 आठवड्यांच्या सुरु उसाला नत्र खतांचा दुसरा हप्ता 40 % नत्र (१०० किलो नत्र म्हणजेच हेक्टरी २१४ किलो युरिया) दयावा. तर ऊसाच्या खोडवा व्यवस्थापन अवस्थेत शेतामध्ये सरीवर ठेवलेल्या पाचटावर प्रती हेक्टरी 80 किलो युरिया आणि 100 किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकावे, त्यानंतर 10 किलो पाचट कुजविणारे जीवाणू संवर्धन संद्रिय खतामध्ये अथवा जोलसर मातीमध्ये मिसळून समप्रमाणात पाचटावर पसरून टाकावे.

    हरभरा - पक्व झालेल्या हरभरा पिकाची त्वरित काढणी आणि मळणी करुन घ्यावी, मळणी करून तयार झालेला शेती माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा.

    कलिंगड - कलिंगडावरील फळमाशीच्या नियंत्रणासाठी 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. क्ल्यू ल्यूर कामगंध सापळे एकरी 5 या प्रमाणात वापरावे.

    सूर्यफूल - सुर्यफुल पिकास फुलौरा ते दाणे भरणे या संवेदनशील अवस्थांमध्ये पाण्याचा ताण पडू देऊ नये, पाण्याची उपलब्धता करावी. दाणे भरणे फुलोरा ते पिक फुलोन्यात असताना सकाळी 7 ते 11 या वेळेत हाताला तलम कापड गुंडाळून फुलाच्या तबकावरून हळुवार हात फिरवावा म्हणजे कृत्रिम परागीभवन होऊन दाणे भरण्याचे प्रमाण वाढते. सूर्यफुलाचे फुल उमलण्याच्या अवस्थेत व त्यानंतर आठ दिवसांनी 2 ग्रॅम बोरॅक्स प्रती लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी त्यामुळे दाणे भरण्याचे प्रमाण व दाण्याचे वजन वाढते. परागीभवन होण्यासाठी प्रती हेक्टरी 4 ते 5 मधमाश्यांच्या पेट्या ठेवाव्यात.

    द्राक्ष - मार्च महिन्यामध्ये द्राक्ष घड काढणीनंतर वेलींमधील अन्नद्रव्यांमधील साठा कमी होतो. द्राक्ष काढणीनंतरच्या खरड छाटणीनंतर वेलींमध्ये अन्नद्रव्य साठा वाढीसाठी नवीन आलेली पाने हि वेलींची वाढ आणि विकासासाठी महत्वाची असतात त्यासाठी खालील उपाय योजना कराव्यात. वेलीवर असलेली पाने सुकू नयेत म्हणून वेलींना गरजेपुरतेच पाणी दयावे. साधारणत दर आठवड्यास 6000 ते 6500 लिटर पाणी प्रती एकर या प्रमाणात यावे. पाणी वाया जात असल्याने पाटाने पाणी देणे टाळावे. पाणी देताना मुळांच्या भागात राहील याची काळजी घ्यावी.

    Youtube वर बघून शेती केली; महिन्याला कमावतो 1,50,000 रुपये, कोण आहे हा शेतकरी?

    पशूधन

    जनावरांचे वाढणान्या तापमानापासून संरक्षणासाठी पुढील उपाय करावेत..

    • जनावरे सावलीच्या ठिकाणी बांधावीत. शक्य असल्यास दिवसातून 4 ते 5 वेळा त्याच्या अंगावर पाणी फवारावे.

    • म्हशींना पाण्यात डुंबू द्यावे.

    • जनावरांना पुरेशे शुद्ध व थंड पाणी पिण्यास द्यावे, जनावरांना पुरेसा प्रथिनेयुक्त हिरवा चारा आणि खनिज मिश्रण द्यावे. दुपारच्या वेळेस जनावरे चारावयास नेऊ नयेत.

    • गोठ्याच्या भिंती पांढऱ्या रंगाने रंगविल्यास तापमान कमी होण्यास मदत होते.

    • गोठ्याच्या छतावर गवताचा थर द्यावा. जेणेकरून प्रखर सूर्य किरणांमुळे छत तापणार नाही.

    पोल्ट्री पक्षी - पोल्ट्रीमधील पक्षाचे वाढणाऱ्या तापमानापासून संरक्षणासाठी पोल्ट्रीच्या बाजूने बारदाणे लावावेत व त्यावर वारंवार पाणी शिंपडावे जेणेकरून आतील तापमान कमी राहण्यास मदत होईल तसेच पोल्ट्रीमध्ये हवा खेळती राहिल याची काळजी घ्यावी,

    (टीप : वरील सर्व माहिती ग्रामीण कृषि मौसम सेवा ऐएमएफयु कोल्हापूर, विभागीय कृषि संशोधन केंद्र, शेंडा पार्क, कोल्हापूर यांच्याकडून देण्यात आली आहे.)

    First published:
    top videos

      Tags: Farmer, Kolhapur, Local18, Sangli, Satara, Weather Forecast