धार्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या असलेलं महत्त्व आणि निसर्गाची मुक्त उधळण यांमुळे कोल्हापूर जिल्हा हा नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र (Tourist Spot) राहिला आहे. समशीतोष्ण वातावरणासह दळणवळणाच्या (कनेक्टिव्हिटी) सोयीसुविधा चांगल्या असल्यामुळे वर्षाचे बाराही महिने कोल्हापुरात पर्यटकांचा ओघ असतो.
दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमधलं महालक्ष्मी मंदिर (Mahalaxmi) हे अठरा महाशक्तिपीठांपैकी एक आहे. साधारणतः इसवी सनाच्या सहाव्या शतकापासून हे मंदिर अस्तित्वात असल्याचे पुरावे आढळतात. शारदीय नवरात्रौत्सवामध्ये, तसंच वर्षातून दोन वेळा सूर्याची किरणं थेट मंदिरातल्या अंबाबाईच्या मूर्ती