मुंबई, 12 जून: मुख्यमंत्रिपदावरून भाजप आणि शिवसेनेत ठिणगी पडली आहे. 50-50 हा फॉर्म्युला ठरल्याचा दावा शिवसेनेचे नेते करत आहेत तर भाजपनं पुढचा मुख्यमंत्री आमचाच अशी घोषणा आधीच सुरू केली आहे. लोकसभेनंतर विधानसभेसाठी युतीच्या आणाभाका घेतलेल्या सेना-भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरून उलटसुलट चर्चेला उधाण आलंय. पण युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी केलेल्या ट्विटमुळे या चर्चेत ट्विस्ट आला आहे. नेमकं काय झालं आहे पाहा स्पेशल रिपोर्ट.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.