जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ...तर 1 नोव्हेंबरपर्यंत मुंबईत लोकल, शाळा, कार्यालये सुरू होऊ शकतात; TIFRचा अहवाल

...तर 1 नोव्हेंबरपर्यंत मुंबईत लोकल, शाळा, कार्यालये सुरू होऊ शकतात; TIFRचा अहवाल

...तर 1 नोव्हेंबरपर्यंत मुंबईत लोकल, शाळा, कार्यालये सुरू होऊ शकतात; TIFRचा अहवाल

देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. राज्यात अनलॉकचा चौथा टप्पा सुरू झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 6 सप्टेंबर: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यात गेल्या मार्च महिन्यापासून लॉकडॉऊन होता. आता टप्प्या टप्प्यानं देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. राज्यात अनलॉकचा चौथा टप्पा सुरू झाला आहे. लॉकडाऊनचे अनेक नियम शिथिल करण्यात आले असले तरी मुंबईसह राज्यात शाळा-महाविद्यालये अद्याप बंद आहे. अनेक शासकीय-खासगी कार्यालये बंद आहेत. विशेष म्हणजे मुंबईची लाईफलाईन थांबली आहे. त्यामुळे अनेक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉर्म होक करण्यास सांगितलं आहे. मात्र तरी देखील आधीसारखं सुरळीत कधी होणार, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. यावर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च अर्थात TIFRनं एक अहवाल तयार केला आहे. TIFR नं आपला अहवाल मुंबई महापालिकेकडे सादर केला आहे. हेही वाचा… हॉटेलमधून जेवून निघाले अन् अज्ञात वाहनाने दुचाकीला चिरडले, तिघांचा जागीच मृत्यू मुंबईतील सर्व कार्यालये आणि सर्व लोकल गाड्या 1 नोव्हेंबरपर्यंत टप्प्या टप्प्यानं धावतील. तर शाळा-महाविद्यालये जानेवारी-2021 पर्यंत सुरू होऊ शकतात, असं या अहवालात म्हटलं आहे. TIFRचा अहवाल गणितीय दृष्टीकोनावर आधारित आहे. स्कूल ऑफ टेक्नोलॉजी आणि कॉम्प्यूटर सायन्सचे संचालक संदीप जुनेजा यांच्या समितीनं हा अहवाल तयार केला आहे. हर्ड इम्युनिटीनुसार, 75 टक्के झोपडपट्टीत आणि 50 टक्के इतर भागात राहणाऱ्या लोकांमध्ये डिसेंबर किंवा जानेवारी 2021 पर्यंत अँटीबॉडीज निर्माण होतील. काय म्हटलं आहे TIFRच्या अहवालात? TIFRच्या अहवालानुसार, सप्टेंबरमध्ये मुंबईतील अनलॉक 30 टक्क्यांपर्यंत वाढवायला हवं. यात शासकीय आणि खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश असावा. ऑक्टोबरपर्यंत 50 टक्के गोष्टी सुरळीत व्हायला हव्यात तर 1 नोव्हेंबरपर्यंत शहरातील सर्व व्यवहार सुरळीत करावेत. मात्र, असं करताना सार्वजनिक वाहतुकीत सोशल डिस्टंसिंग, मास्क वापरणे, हात स्वच्छ करणे त्याचबरोबर कार्यालये, रेल्वे गाड्या, बसेस निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. सप्टेंबरमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढेल… डॉ. संदीप जुनेजा यांनी सांगितलं की, ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढणार आहे. TIFRच्या चमूनं मुंबई महापालिकेसह संयुक्तरित्या 3 प्रभाागात सर्वेक्षण केलं. पहिल्या सर्व्हेत जुलै महिन्यात झोपडपट्टीत 57 टक्के, आणि इतर भागात 16 टक्के अँटीबॉडीज विकसित झाल्या नाहीत. मात्र, दुसरा सर्व्हे या महिन्याच्या शेवटी करण्यात येणार आहेय अपेक्षेप्रमाणे, डिसेंबर 2020 आणि जानेवारी 2021 पर्यंत 75 टक्के झोपडपट्टीत आणि 50 टक्के इतर भागात राहणाऱ्या लोकांमध्ये अँटीबॉडीज निर्माण होतील. हेही वाचा… 19 वर्षीय कोरोना संक्रमित तरुणीवर रुग्णवाहिकेत बलात्कार, नंतर नेलं कोविड सेंटरला TIFR नं मुंबईतील सर्व परिस्थितींचा आढावा घेऊन हा अहवाल तयार केला आहे. मात्र, या अहवालात कोरोनाबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या इशाऱ्याचा उल्लेख नाही. सप्टेंबरमध्यापर्यंत मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आली तर आरोग्य व्यवस्थेवर गंभीर ताण निर्माण होईल, असंही या अहवालात म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात