मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पुण्या-मुंबईबाहेर राज्यातही वाढला कोरोनाचा धोका; दिवसभरात 27 बळी

पुण्या-मुंबईबाहेर राज्यातही वाढला कोरोनाचा धोका; दिवसभरात 27 बळी

तर उरलेल्य क्लस्टर्समध्ये थकव्याचे तीन प्रकार आहेत अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

तर उरलेल्य क्लस्टर्समध्ये थकव्याचे तीन प्रकार आहेत अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

राज्यात मुंबई आणि पुण्यात Coronavirus चा संसर्ग सर्वाधिक झाला आहे. पण आता धोका इतर शहरांमध्येही पोहोचला आहे. आजच्या आकडेवारीवरून विदर्भ आणि मराठवाड्यातही कोरोनाचा धोका वाढल्याचं स्पष्ट होतं.

मुंबई, 27 एप्रिल : मुंबई- पुण्याबाहेर राज्यात Coronavirus चा धोका वाढतो आहे, असं आजच्या ताज्या आकडेवरून समोर आलं आहे. या दोन महानगरांखेरीज विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शहरांमध्ये कोरोनाचा विळखा आवळता जातो आहे, असं आजचे आकडे सांगतात. एका दिवसात राज्यात 522 नवे कोरोनारुग्ण सापडले आणि 27 जणांचा मृत्यू झाला. आता राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 8590झाली आहे आणि आतापर्यंत 369 जणांचा बळी गेला आहे. राज्यात आतापर्यंत 1282 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आजच्या नव्या कोरोनारुग्णांमध्ये औरंगाबादचा आकडा लक्षणीय आहे. एका दिवसात 30 कोरोनाबाधित रुग्ण या शहरात सापडले आहेत. त्यामुळे औरंगाबादमध्ये आता 83 कोरोनारुग्ण झाले आहेत. दिवसभरात राज्यात झालेल्या 27 मृत्यूंपैकी सर्वाधिक 15 मुंबईत झाले असून अमरावती शहरातही 6 मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे विदर्भात नागपूर आणि अमरावती कोरोनाचे हॉटस्पॉट बनत आहेत. पुणे महापालिकेत 4 कोरोनामृत्यूंची नोंद झाली. तर जळगाव आणि औरंगाबाद इथे प्रत्येकी एक जण मृत्युमुखी पडला.

दुसरीकडे देशातही कोरोनारुग्णांची संख्या गेल्या 24 तासात जास्त वाढली आहे. देशात रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली असली तरी आज देशातील मृत्यूंचा आकडा हा वाढला आहे. गेल्या 24 तासात 1,463 नवीन रुग्ण समोर आले आहेत. त्यानंतर आता देशातील रुग्णांची संख्या 28,380 इतकी झाली आहे.

अन्य बातम्या

24 तासांत 60 मृत्यू! देशात आतापर्यंतचे दिवसभरातले सर्वाधिक बळी

पुण्यात धोका वाढला : कोरोनाच्या हॉटस्पॉटमध्ये आता योजणार हा शेवटचा उपाय

सावधान! भारतात जुलै, ऑगस्टमध्ये पुन्हा होऊ शकतो करोनाचा उद्रेक

First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus