औरंगाबाद, 11 फेब्रुवारी : गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हेच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याची चर्चा सुरू आहे. आमदार निलेश लंके यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी बोलताना आपल्याला अजित पवार यांना मुख्यमंत्री बनवायचे आहे, कामाला लागा असे म्हटलं होते. त्यानंतर महाविकास आघाडीकडून यावेळी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार अजित पवार हे आहेत का? यावर चर्चा सुरू झाली आहे. याबाबत शरद पवार यांना विचारले असता त्यांनी म्हटलं होतं की, जरी अनेकांची इच्छा असली तरी आमच्याकडे पुरेस संख्याबळ नाही, त्यामुळे अजित पवार हे मुख्यमंत्री बनू शकत नाहीत, अस पवार यांनी म्हटलं होतं. आता यावर खुद्द अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं काय म्हणाले अजित पवार? गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हेच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत अशी चर्चा सुरू आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. आमच्याकडे पुरेसे संख्याबळ नसल्यानं अजित पवार हे मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. याबाबत अजित पवार यांना विचारले असता त्यांनी यावर बोलण टाळलं. वरिष्ठ बोलल्यानंतर आम्ही बोलत नसतो असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते पैठणमध्ये बोलत होते. हेही वाचा : शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंना कोणाचा पाठिंबा?, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं सरकारला टोला दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारला देखील जोरदार टोला लगावला आहे. रत्नागिरीचे पत्रकार वारीशे यांची हत्याच झाली आहे. त्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. आदित्य ठाकरेंवर हल्ला होतोय, प्रज्ञा सातव यांच्यावर देखील हल्ला झाला. मोठ्या माणसांवर हल्ले सुरू आहेत. सरकार काय करतय? गृहविभाग काय झोपा काढत आहे का? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.