मुंबई, 21 ऑक्टोबर : हिंदू कॅलेंडरनुसार यावर्षी नरक चतुर्दशी 24 ऑक्टोबर 2022 रोजी साजरी केली जाईल. नरक चतुर्दशीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या दिवशी गणेश-माता लक्ष्मी आणि भगवान कुबेराची विशेष पूजा केली जाते, सुख-समृद्धी आणि सौभाग्यासाठी कामना केली जाते. नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नानाला खूप महत्त्व असल्याचे पंडित इंद्रमणी घनश्याल सांगतात. या दिवशी सूर्योदयापूर्वी उटण्याने स्नान करण्याची परंपरा आहे. जाणून घेऊया नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नान का आणि कसे केले जाते आणि त्याचे महत्त्व काय आहे. अभ्यंग स्नानाचे महत्व - शास्त्रानुसार नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी उटणे लावून स्नान करण्याच्या प्रक्रियेला अभ्यंग स्नान म्हणतात. ज्यामध्ये हळद, दही, तिळाचे तेल, बेसन, चंदन, औषधी वनस्पती यांचा लेप केला जातो. या पेस्टने संपूर्ण शरीराची मालिश केली जाते. या प्रक्रियेने शरीरातील छिद्रे उघडली जातात. नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नानाचे महत्त्व आहे, कारण हा दिवस शरीराला दिवाळी या उत्साही सणामध्ये नवचैतन्य देणारा दिवस आहे. अभ्यंग स्नानाने व्यक्तीचे सौंदर्य आणखी खुलते. यामुळे शरीराला रक्तप्रवाह चांगला राहणे, त्वचेचा मुलायमपणा, तणाव दूर करणे आणि मन शांत करणे असे अनेक फायदे मिळतात. हे वाचा - दिवाळीत लक्ष्मीपूजन करताना या गोष्टी ध्यानात ठेवा, धन-धान्य कधी कमी नाही पडत अभ्यंगस्नान कसे केले जाते?
शास्त्रानुसार नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठण्याची परंपरा आहे. सूर्योदयापूर्वी आंघोळ केल्यावर तिळाच्या तेलाने अंगावर मसाज करा. तसेच तुमच्या डोक्यालाही तेलाने मसाज करा. यानंतर 15 ते 20 मिनिटे अगदी शांत चित्ताने ध्यान करत बसा. यानंतर हळद, चंदन पावडर, तीळ पावडर, दही मिसळून पेस्ट तयार करा आणि संपूर्ण शरीरावर घासून घ्या. 15 ते 20 मिनिटे कोरडे होऊ द्या आणि नंतर कोमट पाण्याने आंघोळ करावी.