JOIN US
मराठी बातम्या / अध्यात्म / तुळशीच्या भांड्यात ही एक गोष्ट ठेवल्याने कधीही भासणार नाही पैशांची कमतरता

तुळशीच्या भांड्यात ही एक गोष्ट ठेवल्याने कधीही भासणार नाही पैशांची कमतरता

ज्योतिषांच्या मते हे उपाय केल्याने धनाची कमतरता दूर होऊन समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 जुलै: हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्त्व आहे. घरामध्ये तुळशीचे रोप लावून त्याची पूजा करण्याचे अनेक फायदे आहेत. तुळशीच्या उपायांमध्ये भाग्य बदलण्याची क्षमता असते. असे अनेक तुळशीचे उपाय आहेत जे दरिद्री दूर करण्यास मदत करतात. ज्योतिषांच्या मते हे उपाय केल्याने धनाची कमतरता दूर होऊन समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.

आर्थिक संकट दूर करण्यासाठी करा हे उपाय आर्थिक समस्यांमध्ये तुळशीचे उपाय खूप उपयुक्त ठरू शकतात. शास्त्रानुसार ज्यांच्या घरात धनाची कमतरता आहे, पैसा अजिबात येत नाही, शत्रूत्व आहे, खूप तणाव आहे, त्यांनी तुळशीचा हा उपाय करावा. त्यासाठी तुळशीच्या रोपावर पाण्याऐवजी उसाचा रस अर्पण करायचा आहे. अंजीरात उसाचा रस घेऊन तुळशीच्या मुळापाशी सात वेळा नामस्मरण करून सोडावे. यामुळे संपत्तीची कमतरता दूर होईल. तीन वर्षांत परिणाम दिसायला सुरुवात होईल. लक्ष्मीची कमतरता कधीच भासणार नाही. घरामध्ये चुकूनही रिकाम्या ठेवू नका या 4 गोष्टी, देवी लक्ष्मीचा राहील वास

 हे उपायही येतील कामी

आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी दररोज सकाळी अंघोळीनंतर तुळशीच्या मुळास जल अर्पण करावे. यासोबतच सकाळ संध्याकाळ तुळशीजवळ दिवा लावणे फायदेशीर ठरू शकते. गळ्यात तुळशीचे माळ धारण करणेदेखील फायदेशीर ठरू शकते. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या