कल्याण, 02 जुलै : राज्यात प्लास्टिक बंदी लागू केलेली असतानाही काल मुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमात प्लास्टिकचे ग्लास वापरण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्य सरकारच्या वतीने १३ कोटी वृक्षलागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला असून त्याचा शुभारंभ काल कल्याणच्या वरप गावात झाला. आणि यावेळी प्लास्टिक बंदीला पाठ फिरवत या कार्यक्रमात प्लास्टिकच्या ग्लासचा वापर करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, पालकमंत्री, राज्यमंत्री यांच्यासह अनेक आमदार खासदार उपस्थित होते. पण ऐवढ्या सगळ्यांपैकी कोणालाच प्लास्टिक बंदी आठवण नाही यात आश्चर्य आहे. हेही वाचा…
पाणी वाटण्यासाठी बंदी असलेले प्लास्टिकचे ग्लास या कार्यक्रमात वापरण्यात आले. त्यामुळे आता सरकार यांच्याकडून दंड वसूल करणार का हेच पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आयोजित कार्यक्रमातच हा सगळा प्रकार घडला आहे. त्यामुळे नियम बनवणाऱ्यांनीच सर्रास नियम तोडले असं म्हणायला काही हरकत नाही.