नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी : शिवसेना कुणाची ? या प्रश्नाभोवती गेल्या 6 महिन्यापासून राज्यातील राजकारण ढवळून निघाले. या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यावेळी शिंदे गटाकडून नवीन दाखला देण्यात आला आहे. तर शिवसेनेकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला आहे. राज्यातील सत्ता संघर्ष आणि शिवसेना फुटीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी सुरू झाली. यावेळी शिंदे गटाकडून हरीश साळवे यांनी युक्तीवाद केला. तर शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला आहे. यावेळी साळवे यांनी नबाम रेबिया निकालाचा दाखला दिला आहे. हरीश साळवे यांचा युक्तिवाद
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
दरम्यान, सुनावणीपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. शिंदे कॅम्प म्हणाले की, नबाम रेबिया निकालामुळे आमदारांना अपात्र ठरवण्याचा सभापतींचा अधिकार हिरावून घेतला जात नाही. शिंदे कॅम्पच्या या उत्तराचा अर्थ असा होतो की, शिंदे कॅम्पला नबाम रेबियाच्या निर्णयाचा फेरविचार करायचा नाही. दुसरीकडे, ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांच्या नेतृत्वाखालील उद्धव कॅम्पने नबाम रेबियाच्या निकालाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. नबाम रेबिया निकाल म्हणजे, जर एखाद्या सभापतीला हटवण्याचा ठराव प्रलंबित असेल तर तो 10 व्या अनुसूची अंतर्गत आमदारांना अपात्र ठरवू शकत नाही या 16 आमदारांना नोटीस महाराष्ट्रामध्ये जून महिन्यात सत्तानाट्य सुरू असताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी गुवाहाटीला गेलेल्या 16 आमदारांना तुमच्यावर कारवाई का करू नये? याबाबत 48 तासात उत्तर द्यायची नोटीस पाठवली होती. या 16 आमदारांमध्ये एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, यामिनी जाधव, संदीपान भुमरे, भरत गोगावले. संजय शिरसाट, लता सोनावणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, रमेश बोराने आणि चिमणराव पाटील या 16 आमदारांना ही नोटीस पाठवण्यात आली होती. (धनंजय मुंडेंचं ग्रँड वेलकम भोवलं, पोलिसांनी केली थेट कारवाई) आमदारांना नोटीस पाठवण्यात आल्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. विधानसभा उपाध्यक्षांवर अविश्वासाचा ठराव आला असल्यामुळे ते आम्हाला अशी नोटीस पाठवू शकत नाहीत, असा दावा शिंदे गटातल्या आमदारांनी केला, यानंतर सुप्रीम कोर्टाने आमदारांच्या निलंबनाबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, असे आदेश दिले होते.