मुंबई, 13 जुलै : तुम्ही अनेक तिर्थस्थानी नद्यांचा संगम किंवा उगम होताना पाहिला असेल. कधी दोन तर कधी तिन नद्यांचं संगम होताना पाहणं तसं सामान्य आहे. पण तुम्ही कधी 5 नद्यांचं संगम होताना पाहिलंय का? भारतातील एकमेव असं ठिकाण आहे जिथे 5 नद्यांचं संगम आहे. ज्याबद्दल फार कमी लोकांना ठावूक असेल. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. हे ठिकाण पाचनद म्हणून ओळखले जाते. हे ठिकाण जालौन आणि इटावा सीमेवर वसलेले आहे. याला निसर्गाची देणगी असं म्हणतात, कारण असा अनोखा संगम क्वचितच पाहायला मिळतो. जगातील हे एकमेव ठिकाण आहे जिथे यमुना, चंबळ, सिंध, कुंवरी आणि पहाज अशा 5 नद्यांचा संगम होतो. पचनदला महातीर्थराज असेही म्हणतात. दरवर्षी येथे भाविकांची गर्दी असते. संध्याकाळच्या वेळी येथील नजारा अतिशय सुंदर होतो. हा नजारा पाहून तुम्हाला तुम्ही पृथ्वीवर नसुन कुठल्या वेगळ्याच ठिकाणी आले आहात असे भासेल. Viral Video : नदीचा जन्म कधी पाहिलाय? हा अद्भूत व्हिडीओ तुमच्या अंगावर आणेल काटा पाचनादबद्दल अनेक कथा देखील प्रसिद्ध आहेत, परंतू सर्वात जास्त प्रसिद्ध आहे ती महाभारताची कथा. महाभारतात पांडवांनी वनवासाच्या काळात पाचनादच्या आसपास वास्तव्य केले होते, असे सांगितले जाते. या ठिकाणी भीमाने बकासुराचा वध केला होता. याच्याशी संबंधित आणखी एक कथा लोकप्रिय आहे ती म्हणज, मुचकुंद ऋषींची प्रसिद्ध कथा ऐकून एकदा तुलसीदासजींनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले असे येथील लोकांचे मत आहे. तुळशी दीसजींनी या ठिकाणी येऊन पाणी मागवले. मग मुचकुंद ऋषींनी त्यांच्या कमंडलातून सोडलेले पाणी कधीच संपले नाही आणि तुलसीदासजींना मुचकुंद ऋषींचा महिमा स्वीकारावा लागला आणि ते त्यांच्यापुढे नतमस्तक झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.