इंदूरहून अमळनेरच्या दिशेनं जाणारी एसटी महामंडळाची बस पुल तोडून नर्मदा नदीत कोसळली. या अपघातात आतापर्यंत 15 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. सदर घटनेवर पंतप्रधान मोदींनी दु:ख व्यक्त केले असून अपघातग्रस्तांना शक्य तेवढी मदत करण्याचे आदेश दिले आहेत.