वाचा-VIDEO : काळ बदलला पण क्रिकेटचा देव नाही! सचिनने पुन्हा केली गोलंदाजांची धुलाई 14 वर्ष प्रशिक्षणाचा अनुभव रमन यांनी भारतासाठी 1988मध्ये पदार्पण केले. 2006मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तामिळनाडूचा क्रिकेटर रमन तामिळनाडूचे प्रशिक्षक झाले. दोन वर्षांनंतर त्यांच्या करारास आणखी दोन वर्षे मुदतवाढ देण्यात आली. जुलै 2010मध्ये ते बंगाल क्रिकेट संघाचे प्रशिक्षक झाले. त्यानंतर 2013मध्ये रमन आयपीएल संघ किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे सहाय्यक प्रशिक्षक झाले. पुढच्याच वर्षी 2014 मध्ये रमन आयपीएल टीम कोलकाता नाईट रायडर्सचे फलंदाजीचे प्रशिक्षक झाले, या मोसमात त्याच्या संघानेही जेतेपद जिंकले. त्यानंतर 2015मध्ये बीसीसीआयने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फलंदाजी प्रशिक्षक म्हणून रमन यांची नियुक्ती केली. तर, डिसेंबर 2018मध्ये भारतीय महिला संघाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. वाचा-दोन आठवड्यांआधी मृत्यूशी झाला होता सामना, आता 5 विकेट घेत उडवली फलंदाजांची झोप रमन यांची कारकीर्द भारतीय संघासाठी 1988मध्ये पदार्पण करणाऱ्या डब्ल्यू वी रमन (W V Raman) यांनी 11 कसोटी सामन्यात 24.88च्या सरासरीने 448 धावा केल्या. रमन यांनी 4 अर्धशतक लगावले तर त्यांनी सर्वोत्तम खेळी 96 आहे. याशिवाय त्यांनी 27 एकदिवसीय सामन्यात 23.73च्या सरासरीने 55.63च्या स्ट्राइक रेटने 617 धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर 1 शतक आणि 3 अर्धशतक आहेत. याचबरोबर रमन यांनी 2-2 विकेटही घेतल्या आहेत.The #INDvENG semifinal is called off due to rain. #TeamIndia 🇮🇳🇮🇳 make it to their maiden #T20WorldCup final. pic.twitter.com/y4rfDWjzFi
— BCCI Women (@BCCIWomen) March 5, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.