मुंबई, 20 मे : रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Bangalore) साठी ‘करो वा मरो’ असलेल्या सामन्यात विराट कोहलीला (Virat Kohli) फॉर्म गवसला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर गुरूवारी झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं (Gujarat Titans) पहिल्यांदा बॅटींग करत आरसीबीसमोर 169 रनचं टार्गेट ठेवलं होतं. विराटच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर आरसीबीनं हे टार्गेट 8 विकेट्स राखून पूर्ण केलं आणि स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे. या आयपीएल सिझनमध्ये (IPL 2022) फॉर्मसाठी झगडणाऱ्या विराटनं गुजरात विरूद्ध आत्मविश्वासानं खेळ केला. त्यानं 54 बॉलमध्ये 8 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं 73 रन केले. विराटच्या या खेळीमुळे त्याचे फॅन्स खूश असून सोशल मीडियावरही या खेळीच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
#ViratKohli
— saimking__ 🇮🇳 (@itz_faiz364) May 19, 2022
The king is back 👑
Run - machine is back 🦁
Kohli is back 🐐 pic.twitter.com/hfrEQdLhH2
TELL THE WORLD , TELL THE WORLD. THE KING, #ViratKohli IS BACK MFS. pic.twitter.com/NMrbbbBofG
— NJ (@_masterofchase_) May 19, 2022
Out of words. Don't know what to say
— Dravid in air (@Dravidsrihari) May 19, 2022
Can I say the king is back. No, I don't believe that
Because he is always in form for me.
I am not a fan of winning #ViratKohli
I am a fan of @imVkohli ❤🙏 pic.twitter.com/Ztc4wXiiCC
‘Din aur raat logon ke hote honge, sheron ka zamana hota hai!’ 🔥💪🏼
— Tanay Tiwari (@Tanay_Tiwari) May 19, 2022
There ain’t no sher like you, #ViratKohli! There just ain’t! #RCBvGT pic.twitter.com/evvKBKWMMY
आरसीबीच्या खात्यात आता 14 मॅचमध्ये 8 विजयांसह 16 पॉईंट्स झाले आहेत.प्ले-ऑफच्या उरलेल्या दोन जागांसाठी आता राजस्थान (Rajasthan Royals), दिल्ली (Delhi Capitals) आणि आरसीबी या तीन टीममध्ये रेस आहे. राजस्थान आणि आरसीबीच्या खात्यात 16 पॉईंट्स आहेत तर दिल्लीकडे 14 पॉईंट्स आहेत, पण राजस्थानचं प्ले-ऑफला पोहोचणं जवळपास निश्चित आहे, कारण त्यांचा नेट रन रेट या दोन्ही टीमपेक्षा चांगला आहे. IPL 2022 : ‘त्या’ 90 मिनिटांमुळे बदलला कोहलीचा फॉर्म, मॅचनंतर सांगितलं ‘विराट’ खेळीचं रहस्य गुजरातविरुद्धच्या या विजयासोबतच आरसीबीचं प्ले-ऑफचं आव्हान अजूनही कायम आहे, पण त्यांना आता मुंबई इंडियन्सवर अवलंबून राहावं लागणार आहे. शनिवारी मुंबईने दिल्लीचा पराभव केला, तर आरसीबी प्ले-ऑफमध्ये प्रवेश करेल, पण जर या सामन्यात दिल्लीचा विजय झाला तर मात्र आरसीबीचं प्ले-ऑफ खेळण्याचं स्वप्न धुळीला मिळेल.