मुंबई, 03 सप्टेंबर : हिंदू धर्मात वटवृक्षाला (वडाचे झाड) देव वृक्ष मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, वटवृक्षात ब्रह्मा, श्री हरी आणि शिव यांचा वास असतो. वडाच्या झाडांचे आयुष्य जास्त असते, म्हणून त्याला ‘अक्षयवत’ असेही म्हणतात. देवता वृक्ष असल्याने वटवृक्षाच्या पूजेलाही विशेष स्थान आहे. पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्या मते, अखंड सौभाग्य, आरोग्य आणि सुख-समृद्धीसाठी वटवृक्षाची पूजा केली जाते. वटवृक्षाच्या पूजेचे महत्त्व काय आहे ते जाणून (Banyan Tree Worship) घेऊया. भगवान शिवाने तपश्चर्या केली - धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिवानेही वटवृक्षाखाली समाधी लावून तपश्चर्या केली. मार्कंडेयाला वटवृक्षाच्या पानांवर भगवान श्रीकृष्णाने दर्शन दिले होते. देवी सावित्रीही या अक्षयवटात वास करते. असे मानले जाते की, देवी सावित्रीने आपला पती सत्यवानासाठी वडाच्या झाडाखाली बसून यमराजापासून त्यांचे प्राण वाचवले. म्हणूनच तिला वट सावित्री असेही म्हणतात. वटवृक्षात देवतांचा वास असल्यामुळे त्याची पूजा केल्याने सुख-शांती मिळते. हे वाचा - नखांच्या आकारावरूनही समजतं स्वभाव आणि बरंच काही, या टिप्स वापरून ओळखा वटवृक्षाचे फायदे - शास्त्रात वटवृक्षाचे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. वटवृक्षाखाली तुपाचा दिवा लावल्याने व्यवसायात लाभ होतो. जर कोणी दीर्घकाळ आजारी असेल तर त्याच्या उशाखाली वडाचे मूळ ठेवल्यास फायदा होतो. वडाखाली बसून हनुमान चालीसा केल्यास मानसिक तणावातून आराम मिळतो. घरातील देव्हाऱ्याजवळ वडाच्या झाडाची फांदी ठेवल्याने कुटुंबात सकारात्मक वातावरण राहते. वडाचे झाड औषध म्हणूनही वापरले जाते, जे अनेक रोगांवर फायदेशीर आहे. हे वाचा - येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.