मुंबई, 27 सप्टेंबर : शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. या काळात अनेक जण संपूर्ण नऊ दिवस उपवास करतात. या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गेचे उपासक सात्विक भोजन करतील. या काळात तुम्हाला उपवासासह तुमचे वाढते वजनही नियंत्रित करायचे असेल, तर तळलेले पदार्थ खाण्याऐवजी तुम्हाला दिवसभर भरपूर ऊर्जा मिळेल अशी फळे खायला हवीत. तुम्ही आतापासूनच आहाराबाबत सजग होऊन काही पदार्थांची यादी बनवा, ज्याचे सेवन तुम्ही रोज करावे. येथे आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, नवरात्रीमध्ये प्रतिकारशक्ती वाढवून तुम्ही वजन कसे कमी करू शकता. नवरात्रीत या गोष्टींचा आहारात समावेश करा - सुका मेवा (ड्रायफ्रुट्स) खा - सुका मेवा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. प्रतिकारशक्ती वाढते आणि त्यातून जवळजवळ सर्व आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठा होतो. सुका मेवा खाल्ल्याने तुम्ही दिवसभर एनर्जीने परिपूर्ण असाल. जर तुम्हाला त्याचे दुष्परिणाम टाळायचे असतील तर ते रात्रभर भिजत ठेवा आणि खा. रोज नारळ पाणी प्या - या काळात आहारात साखर मिश्रित सरबत ऐवजी नारळ पाण्याचा समावेश केला तर तुमचे आरोग्यही चांगले राहते आणि तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटते. वास्तविक, नारळाच्या पाण्यात जीवनसत्त्वे, खनिजे, कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, फोलेट, नियासिन, पॅन्टोथेनिक अॅसिड इत्यादी भरपूर प्रमाणात असतात, जे तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही रोज नारळ पाणी प्याल तर ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. याच्या सेवनाने तुमचे वजनही कमी होणार नाही. हे वाचा - येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान दुधाचा वापर - दूध ही तुमच्या शरीरासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्हाला दूध प्यायला आवडत नसेल तर तुम्ही दही, लस्सी इत्यादींचे सेवन करू शकता. याच्या सेवनामुळे शरीरात प्रथिने, कॅल्शियम आणि इतर पौष्टिक घटकांची कमतरता भासणार नाही आणि वजनही वाढणार नाही.
फळे उपवासाच्या या नऊ दिवसांमध्ये जर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची फळे खात असाल तर ते तुमची त्वचा, केस, आरोग्य, पचनसंस्था इत्यादींसाठीही खूप फायदेशीर ठरेल. इतकंच नाही तर रोज ताजी फळं खाल्ल्यास वजनही कमी होईल आणि तुमची रोगप्रतिकारशक्तीही चांगली राहील.

)







