जाहिरात
मराठी बातम्या / अध्यात्म / Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीला शिवलिंगावर का अर्पण करत नाही या वस्तू जाणून घ्या

Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीला शिवलिंगावर का अर्पण करत नाही या वस्तू जाणून घ्या

शिवलिंगाची पूजा करताना या गोष्टी ठेवा लक्षात

शिवलिंगाची पूजा करताना या गोष्टी ठेवा लक्षात

भगवान शंकराच्या पूजेच्या वेळी शिवलिंगावर बेलपत्र, भांग, धतुरा, फळझाड इत्यादी साहित्य अर्पण केले जाते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 15 फेब्रुवारी:  महाशिवरात्री हा हिंदू परंपरेतील फार मोठा सण आहे. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो. या दिवशी भगवान शिवाचा विवाहही झाल्याचे मानले जाते. महादेवाची आराधना केल्याने माणसाला जीवनात पूर्ण आनंद मिळू शकतो. यावेळी 18 फेब्रुवारीला शिवरात्रीचा मोठा उत्सव साजरा होणार आहे. तुम्हाला माहिती आहे का की महादेवाला कुंकू, हळद किंवा तुळशीची पाने कधीही अर्पण केली जात नाहीत. याशिवाय शिवलिंगावर शंखातून जल अर्पण करण्यासही मनाई आहे. जाणून घेऊया यामागचे धार्मिक कारण..

महाशिवरात्रीला घरात आणा या 6 शुभ गोष्टी, घरात नांदेल सुख-समृद्धी

शिवलिंगावर कुंकू का अर्पण करत नाहीत? भगवान शंकराच्या पूजेच्या वेळी शिवलिंगावर बेलपत्र, भांग, धतुरा, फळझाड इत्यादी साहित्य अर्पण केले जाते. पण कुंकू कधीच अर्पण केला जात नाही. खरं तर, हिंदू धर्मात, स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी कुंकू लावतात, तर भगवान शिवाचे एक रूपदेखील विनाशक असल्याचे मानले जाते. त्याच्या विनाशकारी स्वभावामुळे शिवलिंगावर कुंकू अर्पण करणे निषिद्ध मानले जाते. शिवलिंगावर हळद का अर्पण केली जात नाही? हिंदू धर्मात हळद अत्यंत शुद्ध आणि पवित्र मानली जाते. असे असूनही त्याचा उपयोग शिवपूजेत केला जात नाही. शास्त्रानुसार शिवलिंग हे पुरुष तत्त्वाचे प्रतीक असून हळदीचा संबंध स्त्रियांशी आहे. यामुळेच भोलेनाथला हळद अर्पण केली जात नाही. केवळ महाशिवरात्रीलाच नाही, तर इतर कोणत्याही प्रसंगी भगवान शिवाला किंवा शिवलिंगाला हळद अर्पण केली जात नाही.

News18लोकमत
News18लोकमत

शिवलिंगावर तुळशी का अर्पण केली जात नाही? तुळशीचा जन्म तिच्या मागील जन्मी राक्षस कुळात झाला होता. तिचे नाव वृंदा होते, जी भगवान विष्णूची परम भक्त होती. वृंदाचा विवाह राक्षस राजा जालंधरशी झाला होता. पत्नीच्या भक्तीमुळे आणि विष्णूकवचमुळे जालंधरला अमरत्वाचे वरदान लाभले. एकदा जालंधर देवतांशी लढत असताना वृंदा पूजेला बसली आणि पतीच्या विजयासाठी विधी करू लागली. भक्तीच्या प्रभावामुळे जालंधर हरत नव्हता. तेव्हा भगवान शिवाने त्याचा वध केला. वृंदाला आपल्या पतीच्या निधनाने खूप दुःख झाले आणि तिने रागाने महादेवाला शाप दिला की, तुलसीदल त्यांच्या पूजेत कधीही वापरणार नाही. शिवलिंगावर अर्पण कराव्यात या 5 गोष्टी, तुमच्या अनंत अडचणी होतील दूर शिवलिंगाला शंखाने जल अर्पण केले जात नाही शिवलिंगावर कधीही शंख घेऊन जल अर्पण करू नये. प्रत्येक देवतेच्या पूजेत शंख वापरला जातो. पण महादेवाच्या पूजेत कधीच वापरला जात नाही. शिवपुराणानुसार, शंखचूड एक पराक्रमी राक्षस होता, ज्याचा वध स्वतः भगवान शिवाने केला होता. म्हणूनच महाशिवरात्रीला शिवलिंगाला कधीही शंखातून जल अर्पण केले जात नाही. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात