पुणे19 फेब्रुवारी : ‘एल्गार’ परिषदेच्या चौकशीवरून सध्या महाविकास आघाडीत धुसफूस सुरु आहे. या प्रकरणाची चौकशी SITच्या माध्यमातूनच करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लावून धरली होती. NIAने या प्रकरणाची चौकशी करण्याला त्यांचा ठाम विरोध होता. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी NIAचौकशीला मंजूरी दिल्याने महाविकास आघाडीत सर्वच काही आलबेल नाही असं स्पष्ट झालं होतं. नंतर शरद पवारांनीही काही पत्रकार परिषदांमध्ये यावर नाराजी व्यक्त केली. मात्र चौकशीचा निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांना आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यावर खुलासा केलाय. त्यानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात मतभेद निर्माण झालेत का? अशी चर्चा केली जाऊ लागली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या बैठकीतही यावर चर्चा झाली. CAA/NRC/NPRलाही राष्ट्रवादीने तीव्र विरोध केलाय. तर उद्धव ठाकरे यांनी NRCला विरोध असल्याचं सांगत CAA/NPRला मात्र विरोध नसल्याचं स्पष्ट केलं होतं.या सगळ्या मतभेदांच्या चर्चेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खुलासा केलाय. शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवनेरीवर एकत्र आले होते. त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, महाविकास आघाडीत मतभेद नाहीत. सगळे प्रश्न आम्ही समन्वयाने सोडवू. प्रत्येक पक्षाची भूमिका वेगळी असते. मात्र आम्ही पहिले आमच्या किमान समान कार्यक्रमाला बांधील आहोत. ‘देश हम सबको चलाना है…’, रतन टाटांनी शेअर केला नव्या मिशनचा हृदयस्पर्शी VIDEO ते पुढे म्हणाले, शिव जन्मोत्सवाला नेहमी येत असतो. पण एवढी गर्दी प्रथमच पाहिली. लोकांना रयतेचे राज्य आलं असं वाटतं. आपला माणूस मुख्यमंत्री झाला अशी लोकभावना आहे. मराठा आरक्षण आंदोलनात नियमाच्या अधीन राहून कायद्याच्या चौकटीत राहून शासकीय मालमत्तेचे नुकसान केलं नाही असे गुन्हे मागे घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
EXCLUSIVE कसाबला मारण्याचा दाऊदचा प्लान? छोटा शकीलचा पहिल्यांदाच खळबळजनक खुलासा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले? सरकारे आली आणि गेलीत. मात्र हे सरकार टिकेल. काही जणांच्या पोटात दुखतंय. हे सरकार लोकांना आपलं वाटतंय. मघाशी आम्ही बसलो होतो कार्यक्रम बघत, एक कार्यकर्ता म्हटला दादांना सांभाळा. काळजी करू नका. दादा एवढी वर्षे उगीच वाया घालवली. यापुढेही एकत्र राहू आणि काम करू.