नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी: भारताची डिजिटल पेमेंट सिस्टम UPI आणि सिंगापूरची पेमेंट सिस्टम PayNow या दोन्ही सिस्टिम आता एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास आणि सिंगापूरचे पंतप्रधान ह्युएन लाँग यांनी मंगळवारी त्याची सुरुवात केली. या प्रणालीला जोडण्याचा प्रकल्प दोन्ही देशांनी 2021 सालीच सुरू केला होता. पण आता अखेर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा लाभ सर्वसामान्यांना कसा मिळणार आणि त्याचे महत्त्व काय हे आपण जाणून घेऊया... Pan Card हरवलंय? तर डोंट वरी, सोप्या स्टेप्स फॉलो करुन मिळवा परत
सर्वप्रथम, UPI आणि PayNow म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे. युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI ही भारताची मोबाईल आधारित पेमेंट सिस्टिम आहे, जी ग्राहकाला 24-तास पेमेंट सुविधा प्रदान करते. UPI प्रत्येक पेमेंटसाठी व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस (VPA) तयार करते. ज्यामुळे पर्सन टू पर्सन किंवा पर्सन टू मर्चेंट पेमेंट कोणत्याही रिस्कशिवाय पूर्ण करता येतात. PayNow देखील त्याच धर्तीवर कमी-अधिक प्रमाणात कार्य करते. सिंगापूरच्या बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांद्वारे निधी हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करते. सिंगापूरमधील या सिस्टमद्वारे, ग्राहक त्यांच्या बँक खात्यातून किंवा ई-वॉलेटमधून इतरांना मोबाइलद्वारे फंड पाठवू किंवा रिसिव्ह करू शकतात. ही प्रक्रिया नॅशनल रजिस्ट्रेशन आयडेंटिटी कार्ड किंवा फॉरेन आयडेंटिफिकेशन नंबरच्या माध्यमातून पूर्ण केली जाते.
दोन्ही सिस्टम एकत्र येणे म्हणजे काय? : दोन देशांमधील किरकोळ देयके फारशी पारदर्शक नसतात, तर दुसरीकडे अशा व्यवहारांवर जास्त चार्जेस आकारल्यामुळे ते महाग होते. UPI-PayNow लिंक झाल्यामुळे या समस्येवर थेट उपाय सापडला आहे. आता भारतातील नागरिक सिंगापूरमध्ये किरकोळ पेमेंट सहज करू शकतील. तर सिंगापूरचे लोक कोणत्याही अडचणीशिवाय भारतीय बाजारपेठेत पैसे पाठवू शकतील. म्हणजेच दोन्ही देशांमधील किरकोळ व्यवहार अधिक सुरक्षित, सोपे, पारदर्शक आणि स्वस्त झाले आहेत.
सामान्य माणसाला कसा फायदा होईल : ही पेमेंट सिस्टम सुरू झाल्यामुळे, सिंगापूरमध्ये व्यवसाय करणाऱ्या किंवा फिरायला जाणाऱ्या किंवा काम करणाऱ्या लोकांसाठी सोपे झाले आहे. तुम्ही सिंगापूरला भेट देत असाल, तर तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय तेथील रिटेल आउटलेटवर UPI वापरून पेमेंट करू शकाल. याशिवाय हजारो भारतीय सिंगापूरमध्ये काम करतात, त्यांच्यासाठी आता मायदेशी पैसे पाठवणे सोपे आणि स्वस्त झाले आहे. एवढेच नाही तर सिंगापूरमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना घरबसल्या पैसे मिळणे सोपे झाले आहे.
रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, दरवर्षी सिंगापूरमधून लोक कोट्यवधी रुपये भारतात त्यांच्या घरी पाठवतात. 2021 च्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, परदेशातून भारतात पाठवलेल्या एकूण रेमिटन्सपैकी 5.7 टक्के वाटा एकट्या सिंगापूरचा आहे. EPFO News : ईपीएफओमधून जास्त पेन्शन हवीये? नवीन गाइडलाइन्स जारी, असा करता येणार अर्ज