दरम्यान, TRP प्रकरणांचा मुंबई पोलिसांनी नुकताच भंडाफोड केला. TRP प्रकरणात ठाकरे सरकार आणि गृहमंत्री अनिल देशमुख त्या चॅनेल वाल्यांना का घाबरत आहे, असा सवाल देखील सोमय्या यांनी केला आहे. विरोधी पक्ष म्हणून आम्ही कोविडमध्ये पूर्ण जबाबदारीने काम करत आहे. कोविडमध्ये किती जण मृत्युमुखी पडले आहे. त्यामुळे हे सरकार त्यांच्या पापाने पडणार, असा खोचक टोला किरीट सोमय्या यांनी लगावला आहे.. मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर sra प्रकरणात खोटे बोलत आहे. तर याबाबत आम्ही पुढे जनहित याचिका दाखल करणार आहे, असंही सोमय्या यांनी सांगितलं. हेही वाचा...‘छत्रपतींचा अपमान झालाय, संभाजी भिडेंनी बोललं पाहिजे’, राऊतांनी साधला निशाणा इलेक्ट्रिक बिलबाबत आव्वाच्या सव्वा आले आहे. ठाकरे सरकार उत्तर देऊ शकली नाही. मला विश्वास आहे, आम्हाला न्याय मिळेन, असं किरीट सोमय्या यांनी यावेळी सांगितलं.ठाकरे सरकारचे येत्या काही दिवसांत तीन विकेट पडणार...@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks pic.twitter.com/XmGvEtISnB
— News18Lokmat (@News18lokmat) October 9, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra, Udhav thackarey