मराठी बातम्या /बातम्या /देश /Corona मुळे मानसिक तणावात वाढ, 2020 मध्ये भारतात दररोज 31 मुलांनी केली आत्महत्या; NCRB चा रिपोर्ट

Corona मुळे मानसिक तणावात वाढ, 2020 मध्ये भारतात दररोज 31 मुलांनी केली आत्महत्या; NCRB चा रिपोर्ट

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे बालकांवरच्या मानसिक तणावात वाढ झाली.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे बालकांवरच्या मानसिक तणावात वाढ झाली.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे बालकांवरच्या मानसिक तणावात वाढ झाली.

नवी दिल्ली, 01 नोव्हेंबर: कोरोना विषाणूच्या (Corona Pandemic) संसर्गाचा कहर आता ओसरला असला, तरी तो अद्याप पूर्णतः संपलेला नाही. कोरोनाने लाखो जणांचे प्राण घेतले. त्यासोबतच एका सरकारी अहवालात असा दावा करण्यात आला आहे, की 2020 या वर्षात दर दिवशी 31 बालकांनी आत्महत्या केली. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे बालकांवरच्या मानसिक तणावात वाढ झाली. त्यामुळे बालकांच्या आत्महत्यांच्या प्रमाणात 2020 या वर्षात वाढ झाली. नॅशनल क्राइम रेकॉर्डस् ब्यूरोच्या (NCRB) आकडेवारीनुसार 2020मध्ये भारतात 11,396 बालकांनी आत्महत्या केली आहे. हा आकडा 2019च्या तुलनेत 18 टक्क्यांनी, तर 2018च्या तुलनेत 21 टक्क्यांनी जास्त आहे. 2018मध्ये 9413 बालकांनी, तर 2019मध्ये 9613 बालकांनी आत्महत्या (Children Suicide) केली होती.

या आकडेवारीत 18 वर्षांखालच्या मुलांच्या आत्महत्यांचा समावेश आहे. या मुलांच्या आत्महत्येमागे कौटुंबिक कारणंही होती. 2020 साली कौटुंबिक कारणांमुळे 4006 मुलांनी, प्रेमप्रकरणामुळे 1337 मुलांनी, तर आजारपणामुळे 1327 मुलांनी आत्महत्या केली. काही मुलांच्या आत्महत्येमागे वैचारिक कारणं, गरिबी, नपुंसकता, नशा अशी वेगवेगळी कारणं होती. 'सेव्ह दी चिल्ड्रन' या संस्थेचे बालसंरक्षण उपसंचालक प्रभातकुमार यांनी सांगितलं, की कोविड-19, शाळा-कॉलेजेस बंद असणं, सामाजिक दुरावा वाढणं यांमुळे मुलं, तसंच तरुणांमध्ये मानसिक स्वास्थ्याच्या समस्यांत वाढ झाली आहे.

हेही वाचा-  'Miss Kerala' विजेत्या अन् उपविजेत्या सौंदर्यवतींच्या कारला भीषण अपघात; दोघींचा जागीच मृत्यू

 ते म्हणतात, 'एक समाज म्हणून राष्ट्राच्या मनुष्यबळ विकासासाठी (Human Resource Development) शिक्षण आणि शारीरिक स्वास्थ्यासारख्या विषयांकडे लक्ष दिलं जातं; मात्र भावनिक, मानसिक आरोग्याकडे तुलनेने कमी लक्ष दिलं जातं. बालकांच्या किंवा तरुणांच्या आत्महत्यांच्या संख्येत झालेली वाढ आपल्या यंत्रणेची विफलता दर्शवते. बालकांचा, तरुणांचा मानसिक, भावनिक विकास होण्यासाठी आई-वडील, कुटुंबीय, नातेवाईक, शेजारी आणि सरकार या सर्वांकडून प्रयत्न व्हायला पाहिजेत, चांगलं वातावरण उपलब्ध करून दिलं गेलं पाहिजे. त्यामुळे मुलं आपली क्षमता ओळखून आपल्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी प्रयत्नशील राहू शकतील.'

हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना प्रभातकुमार यांनी सांगितलं, 'लोकसंख्येच्या तुलनेत कमी असलेली मानसोपचारतज्ज्ञांची संख्या हा विशेष महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. मुलांना आणि तरुणांना उत्साहवर्धक आणि चांगलं वातावरण उपलब्ध होण्यासाठी सामूहिक प्रयत्न करायला हवेत, असं आवाहन 'सेव्ह द चिल्ड्रेन'कडून केलं जात आहे.'

हेही वाचा-  अखेर सब्यसाचीने घेतली माघार; ती वादग्रस्त जाहिरात हटवत मागितली माफी

 चाइल्ड राइट्स अँड यू (CRY) या संस्थेच्या पॉलिसी रिसर्च अँड अॅडव्होकसीच्या डायरेक्टर प्रीती महारा सांगतात, की एनसीआरबीची आकडेवारी भीतिदायक आहे. 2020मधल्या बालकांच्या आत्महत्यांमध्ये 5392 मुलांच्या आणि 6004 मुलींच्या आत्महत्यांचा समावेश आहे. प्रति दिन 31 मुलांच्या आत्महत्या याचा अर्थ तासाला एका मुलाची आत्महत्या. शाळा दीर्घ काळ बंद राहिल्यामुळे, सामाजिक संपर्क मर्यादित राहिल्यामुळे, घरात अडकून पडावं लागल्यामुळे, मित्रमंडळी, शिक्षक किंवा विश्वासाच्या अन्य व्यक्तींशी होणारा संवाद कमी झाल्यामुळे मुलं जबरदस्त मानसिक तणावातून जात आहेत. अनेक मुलांना आपल्या प्रिय व्यक्तींच्या मृत्यूचं कटू सत्य पचवावं लागलं आहे. संसर्गाची भीती आणि आर्थिक संकटाचे दुष्परिणाम त्यांनी भोगले आहेत. अनेक मुलांना शिक्षणाचंही टेन्शन आलं होतं. कारण ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय सर्वांसाठी सुलभ नव्हता. अनेकांना त्यासाठी संघर्ष करावा लागत होता.

सेंटर फॉर अॅडव्होकसी अँड रिसर्चच्या कार्यकारी संचालिका अखिला शिवदास यांनी सांगितलं, की याच्याशी संबंधित क्षेत्रातल्या व्यक्तींच्या सहयोगाने परस्परसंवादाचं, चर्चेचं एक मॉडेल विकसित करण्याची गरज आहे, ते समाजापर्यंत नेण्याची गरज आहे. ही जबाबदारी सर्वांनी उचलली पाहिदे. पोद्दार फाउंडेशनच्या मॅनेजिंग ट्रस्टी आणि मानसिक आरोग्य विशेषज्ञ प्रकृती पोद्दार यांनी सांगितलं, की आपल्या मुलांची मानसिक स्थिती किती नाजूक आहे हे आई-वडिलांनी ओळखलं पाहिजे आणि त्याचं आकलन वेळोवेळी करत राहिलं पाहिजे.

हेही वाचा- Video: मुख्यमंत्र्यांनी जिंकली सर्वांची मने, VIP कल्‍चर झुगारुन रुग्णवाहिकेला दिले स्थान

 मुलांच्या मानसिक आरोग्याची स्थिती (Mental Health) आणि पॅटर्न ओळखण्यासाठी शिक्षकांनाही प्रशिक्षित करण्याची गरज आहे. मुलांच्या मानसिक समस्या गोपनीय पद्धतीने सोडवण्यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये विशेष कार्यक्रम असला पाहिजे. प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी असते. त्यामुळे असे कार्यक्रम लवचिक असले पाहिजेत, जेणेकरून प्रत्येक मुलाच्या व्यक्तिगत गरजा पूर्ण होऊ शकतील, असं प्रकृती पोद्दार म्हणतात.

First published:

Tags: Coronavirus, India, Suicide