मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /आर्यन खान प्रकरणातून समीर वानखेडेंना हटवलं, नवाब मलिक म्हणाले...

आर्यन खान प्रकरणातून समीर वानखेडेंना हटवलं, नवाब मलिक म्हणाले...

'आर्यन खान प्रकरणासह 5 प्रकरणांमधून समीर वानखेडे यांची हकालपट्टी केली आहे एकूण 26 प्रकरणे तपासण्याची गरज आहे.

मुंबई, 05 नोव्हेंबर : मुंबई क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणी आर्यन खानला अटक (Aryan Khan arrest case) प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी एनसीबीचे मुंबई विभागाचे अधिकारी समीर वानखेडेंवर (sameer wankhede) गंभीर आरोप केले होते. अखेर वानखेडेंकडून 6 प्रकरणं काढून घेण्यात आली आहे. ही तर फक्त सुरुवात आहे, ही व्यवस्था स्वच्छ करण्यासाठी अजून बरेच काही करावे लागले, असं म्हणत मलिक यांनी नवा इशारा दिला आहे.

आर्यन खानला अटक करणे NCB चे मुंबई विभागाचे अधिकारी समीर वानखेडे (sameer wankhede) यांना चांगलेच भोवले आहे. समीर वानखेडे यांच्यासह एकूण 6 प्रकरणं काढून घेण्यात आली आहे. या प्रकरणी आता नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. नवाब मलिक यांनी ट्वीट करून या कारवाईबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

'आर्यन खान प्रकरणासह 5 प्रकरणांमधून समीर वानखेडे यांची हकालपट्टी केली आहे एकूण 26 प्रकरणे तपासण्याची गरज आहे. ही फक्त सुरुवात आहे. ही व्यवस्था स्वच्छ करण्यासाठी अजून बरेच काही करावे लागेल आणि आम्ही ते करू, असं मलिक म्हणाले.

दरम्यान, दुसरीकडे समीर वानखेडे यांनी आपल्याला पदावरून हटवलं नाही, असा दावा केला आहे. 'माझी बदली झालेली नाहीये, मी अद्याप झोनल डायरेक्टर पदावर कायम आहे. बदलीच्या फक्त अफवा आहेत फक्त 6 केसेस दिल्लीतील टिमकडे देण्यात आल्यात. आर्यन खान, समीर खान यांच्या केसचा तपास त्या टीमकडून होणार आहे. आयपीएस संजय सिंह यांच्या नेतृत्वात तपास होणार आहे, अशी माहितीही समीर वानखेडेंनी दिली.

तसंच, 'मी मुंबईतच झोनल डायरेक्टर म्हणून  कायम आहे. आर्यन खान, समीर खान आणि इतर 4 केसेस च्या तपासासाठी एनसीबी दिल्लीने एका विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. मी माझ्या याचिकेत म्हटलं होतं की, या दोन केसेस कोणत्याही केंद्रीय तपास यंत्रणेकडून तपास केल्या जाव्यात' असंही वानखेडे म्हणाले.

दरम्यान,एनसीबीने या प्रकरणी पहिल्यांदाच मोठे पाऊल उचलले आहे. आर्यन खान प्रकरण समीर वानखेडेंकडून काढून घेण्यात आले पण आणखी 6 प्रकरणं काढली आहे.

मधमाशांपासून वाचण्यासाठी पाण्यात उडी, माशांच्या हल्ल्यात मृत्यू

या आठवड्याच्या सुरुवातीला जारी केलेल्या आदेशात डीजी एनसीबीने मुंबई झोनल युनिटमधून 6 प्रकरणे सेंट्रल युनिटकडे हस्तांतरित केली. ही पाच प्रकरणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील आहेत आणि जिथे आंतरराज्यीय संबंध गुंतलेले आहेत. आर्यन खान, समीर खान या प्रकरणासह अरमान कोहली, इकबाल कासकर, कश्मीर ड्रग्स प्रकरणासह एकूण 6 प्रकरणाचा तपास दिल्ली एनसीबी करणार आहे.

अरमान खान आणि आर्यन खान सारखी ही काही बॉलिवूड प्रकरणे आहेत. आता वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय सिंह या प्रकरणाचा तपास पाहणार आहे.  संजय सिंग एनसीबीमध्ये डीडीजी ऑपरेशन्स आहेत. ही संवेदनशील प्रकरणे हलवण्यात आली आहे. या प्रकरणाचा संपूर्ण नव्याने तपास पुराव्यानिशी केला जाणार असल्याची माहितीसमोर आली आहे.

'या' ऑटो शेअरमध्ये 29 टक्के रिटर्न्स अपेक्षित, मोतीलाल ओसवालकडून BUY रेटिंग

सेंट्रल युनिट मॉनिटरिंगमुळे आर्यन खानसारख्या हायप्रोफाईल प्रकरणांबद्दलचा अनावश्यक वाद टाळता येईल, अशी भूमिका एनसीबीने घेतली आहे. या प्रकरणातून समीर वानखेडे यांना हटवण्यात आल्यानंतर या प्रकरणाचा टेकओव्हर चौकशीसाठी संजय सिंह उद्या टीमसह मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे.

First published:
top videos