मुख्य म्हणजे या भागीदारीत जिओ प्लॅटफॉर्म, रिलायन्स रिटेल आणि व्हॉट्सअॅपवरही करार होणार आहे. या अंतर्गत रिलायन्स रिटेलच्या व्यवसायाला वेग देण्याचा करार होईल. JioMart आणि WhatsApp मिळून भारतातील 3 कोटी किराणा दुकाने सक्षम करणार असल्याचेही यावेळी मुकेश अंबानी यांनी सांगितले. वाचा-रिलायन्स फाउंडेशनचे जगातील सर्वात मोठं मिशन, 3 कोटी लोकांना करणार अन्नदान 2016मध्ये रिलायन्स कंपनीने टेलिकॉम क्षेत्रात जिओ आणलं. जिओनं 4 वर्षांमध्ये प्रतिस्पर्धांना टक्कर देत टेलिकॉम क्षेत्रात आपलं वचर्स्व निर्माण केलं आहे. रिलान्सने टेलिकॉम ते होम ब्रॉडबॅण्डपर्यंत आपल्या सेवा विस्तारीत केल्या आहेत. भारतात फेसबुक आणि मेसेज अॅप आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी वापरलं जाणारं अॅप म्हणजे व्हॉटसअॅपचं मोठं मार्केट आहे. फेसबुकचे 400 मिलियन यूझर्स आहेत. 2020 मध्ये इंटरनेट यूझर्सची संख्या दुप्पट होण्याची अशा आहे. वाचा-रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना देणार जादा वेतन डिजिटल इंडिया मिशन पूर्ण होईल रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न केल्याचे जिओ आणि फेसबुक करारावर सांगितले. दीर्घकालीन भागीदार म्हणून फेसबुकचे स्वागत आहे. डिजिटल इंडियाचे ध्येय जिओ आणि फेसबुकच्या कराराद्वारे पूर्ण होईल, असेही मुकेश अंबानी यावेळी म्हणाले. संपादन-प्रियांका गावडे.@Facebook has announced an investment of 5.7 billion dollars or ₹43,574 cr in @reliancejio for a 9.99% stake, making this the largest technology sector FDI in India. Mukesh Ambani, Chairman & MD, talks about the #FacebookRelJiodeal pic.twitter.com/QuYCbg5nip
— CNBC-TV18 (@CNBCTV18News) April 22, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.