मुंबई, 12 जुलै : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana Patole) यांनी आपल्यावर मुख्यमंत्री आणि गृहखात्याकडून पाळत ठेवली जात असल्याच्या आरोप केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या पाठोपाठ शिवसेनेनंही पटोले यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पटोले यांना काही बोलायचं असेल तर खासगीत बोलावे, चव्हाट्यावर बोलू नये, असा सल्लाच
शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद सावंत (arvind sawant) यांनी दिला.
न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना अरविंद सावंत यांनी नाना पटोले यांच्या विधानावर आश्चर्य व्यक्त करत नाराजी व्यक्त केली आहे. 'नाना पटोले हे एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते विधानसभा अध्यक्ष राहिले आहेत त्यामुळे आपण काय बोलतोय याचं भान राहिलं पाहिजे. नाना पटोले यांना जे काही बोलायचं आहे ते त्यांनी खाजगीत बोलावं चव्हाट्यावर बोलू नये, असा सल्लावजा टोला सावंत यांनी लगावला.
खरंच?, केंद्र सरकारच्या नव्या स्कीममुळे तुम्हीही सुरु करता पोस्ट ऑफिस
'तुम्हाला काही अडचण आहे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना किंवा बाळासाहेब थोरात यांना सांगा पण असं वक्तव्य करणे योग्य नाही. अशा लोकांमुळे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा खराब होणार नाही. याचा विचार केला पाहिजे, त्यांना कसं थांबवायचं हे आता त्याचा पक्ष आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील, असंही सावंत म्हणाले.
नाना पटोलेंच्या आरोपांवर अजित पवार भडकले
दरम्यान, नाना पटोले यांनी आपल्याच सरकारवर पाळत ठेवण्याचा केलेला आरोप हा महाविकास आघाडीला सुरुंग लागत असल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे, अशी माहिती समोर आली आहे.
नाना पटोले यांच्यावर अशा कोणत्याही प्रकारची पाळत ठेवण्यात आली नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे काँग्रेसच्या नेत्यांसोबत बोलणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांत नाना पटोले यांच्या सातत्याने आरोप होत असल्यामुळे राष्ट्रवादीने नाराजी व्यक्त केली आहे.
ENG vs PAK : गळ्यातल्या लॉकेटमुळे पाकिस्तानचा हसन अली पुन्हा चर्चेत
तर, नाना पटोले यांच्यावर पाळत ठेवली जात नाही. जो नेता असतो त्याच्या माहिती गोळा केली जाते. नाना पटोले यांनी ही माहिती करून घ्यावी. आवश्यकता वाटली तर याबद्दलची माहिती काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्री यांच्याकडून घ्यावी त्यांना किंवा त्यांच्या नेत्यांना पोलीस बंदोबस्त नको असेल तर त्यांनी तसा अर्ज करावा, असा टोला राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पटोले यांनी लगावला.
काय म्हणाले नाना पटोले?
'त्यांच्याकडे मुख्यमंत्री आणि गृहमंत्रिपदाचा कार्यभार आहे. त्यामुळे यंत्रणांना सर्व रिपोर्ट त्यांना द्यावे लागतात. राज्यात कुठे काय चालू आहे, आंदोलनं कुठे होत आहे. याबद्दलची प्रत्येक अपडेट त्यांना द्यावी लागत असतात. मी कुठे काय करतो, हे सुद्धा त्यांना माहीत असते', असा दावाच पटोले यांनी केला आहे.
तसंच, 'राज्यात काँग्रेस वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. पक्ष आणखी बळकट करण्याचा आम्हाचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे, हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकत चालली आहे. याबद्दल त्यांना माहिती असून ते कुठे ना कुठे आपल्याला पिंजऱ्यात आणायचा प्रयत्त करणार' असंही पटोले म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.