नवी दिल्ली, 24 एप्रिल: ITR दाखल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. यानंतरही तुम्ही ITR दाखल करू शकता. परंतु यासाठी 5000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल. आयकर विभागाकडून स्पष्टपणे सांगण्यात येत आहे की 31 जुलैपर्यंत तुमचा ITR दाखल करा. अन्यथा 1 ऑगस्टपासून हे काम करण्यासाठी दंड भरावा लागेल. यासोबतच, आयकर विभाग काही विशिष्ट परिस्थितीत करदात्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करू शकतो.
तुम्ही फाइलिंग पुढे ढकलल्यास, दंड 10,000 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता असते. तसेच, तुमच्याकडे काही कर थकबाकी असल्यास आणि ते मुदतीपर्यंत न भरल्यास, तुम्हाला अजूनही थकित रकमेवर व्याज द्यावे लागेल. यासोबतच, करपात्र उत्पन्न नसल्यास ते 1,000 रुपयांपर्यंत कमी करण्याचा नियम आहे. आयटीआर न भरल्याच्या काही प्रकरणांमध्ये तुम्हाला तुरुंगवासही होऊ शकतो.
दंड आणि व्याज किती असतो?
तुम्ही चुकून ITR भरला नसेल, तर पेनाल्टीची रक्कम एकूण टॅक्स दायित्वाच्या 50 टक्के असेल. मुद्दाम दाखल केले नाही तर 200 टक्के होईल. तुम्हाला हा दंड टॅक्स दायित्वाच्या वर भरावा लागेल. यासह टॅक्स दायित्वावर 1 टक्के दराने व्याज द्यावे लागेल. आयटीआर भरण्याची शेवटची तारीख संपेल त्या दिवसापासून तुम्हाला व्याजदर भरावा लागेल.
विमान आणि ट्रेनच्या पायलटला कसा सापडतो रस्ता? कोणत्या टेक्नॉलॉजीचा होतो वापर?कधी होऊ शकतो तुरुंगवास?
आयटीआर न भरल्यास तुरुंगवास देखील होऊ शकतो. कर न भरल्यास, तुरुंगवासाची शिक्षा देण्याचा निर्णय अत्यंत टोकाच्या प्रकरणांमध्ये घेतला जातो. परंतु तरीही काही नियम तुम्हाला असायलाच हवेत. ITR दाखल न केल्यास 6 महिने ते 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. मात्र, त्यासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. आयकर विभाग अशा प्रकरणांमध्येच खटला चालवू शकतो जेव्हा कराची रक्कम 10,000 रुपयांपेक्षा जास्त असेल.