नवी दिल्ली, 12 सप्टेंबर : कर्मचारी राज्य विमा महामंडळने (ESIC) अटल बीमित व्यक्ती कल्याण योजना 30 जून 2022 पर्यंत वाढवली आहे. या योजनेंतर्गत औद्योगिक कामगारांना बेरोजगारी भत्ता दिला जातो. ESIC बेरोजगारी लाभ, ज्याचा उद्देश कोरोनाच्या काळात नोकरी गमावलेल्या कामगारांना आर्थिक सहाय्य करणं असून यावर्षी 30 जून रोजी संपला होता. आता 1 जुलै 2021 ते 30 जून 2022 पर्यंत सुरू राहणार आहे. अटल बीमित कल्याण योजनेअंतर्गत नोकरी गमावणाऱ्या संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सरकारकडून आर्थिक मदत मिळते. हा एक बेरोजगारी भत्ता आहे, ज्याचा लाभ फक्त त्याच कर्मचाऱ्यांना मिळतो, जे ESIC स्किमअंतर्गत कव्हर आहेत. म्हणजेच ESI योगदान त्यांच्या मासिक पगारातून कापलं जातं. योजनेअंतर्गत बेरोजगार झाल्यास, सरकारकडून जास्तीत जास्त 90 दिवस म्हणजे 3 महिने आर्थिक मदत दिली जाते.
वैयक्तिक माहिती कुणासह शेअर केलात तर होईल मोठं नुकसान, PF चे पैसे होतील लंपास
कोरोना काळापासून आतापर्यंत 50000 हून अधिक लोकांना या योजनेचा लाभ निळाला आहे. कोणत्याही कारणामुळे नोकरी गमावलेल्या विमाधारकांना 3 महिन्यांसाठी 50 टक्के पगारावर बेरोजगारी भत्ता देण्याची ही योजना आहे.
श्री भूपेंद्र यादव, श्रम एवं रोजगार मंत्री, भारत सरकार की अध्यक्षता में 10.09.2021 को ईएसआईसी की 185वीं बैठक सम्पन्न हुई। श्री रामेश्वर तेली, श्रम एवं रोजगार तथा पेट्रोलियम एवं प्राकृतिक गैस राज्य मंत्री, भारत सरकार बैठक में उपाध्यक्ष के तौर पर उपस्थित रहे।#ESIC @byadavbjp pic.twitter.com/R3WZmMeI97
— ESIC - Healthy Workforce - Prosperous India (@esichq) September 11, 2021
आता आधारप्रमाणे मिळणार यूनिक हेल्थ कार्ड, उपचाराचीही होणार नोंद
केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या 185 व्या बैठकीत अटल बीमित कल्याण योजना जून 2022 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.