मुंबई, 11 नोव्हेंबर : प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरी भोवतीची अतिक्रमणे हटवण्यात आल्याने राज्यातील सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. अफजलखानाच्या वढ करण्यात आलेल्या दिवशीच सरकारने हे काम हाती घेतल्याने शिवप्रेमींनी प्रतापगडावर मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. दरम्यान माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहत आणखी काही सूचना केल्या आहेत.
..या धाडसी निर्णयामुळे आता शिवभक्तांच्या सरकारकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. केवळ इतक्यावरच न थांबत राज्यातील प्रत्येक किल्ल्यावर झालेली अशी अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे सरकारने धडक मोहीम उघडून जमीनदोस्त करावीत. या मोहिमेत आमचे पूर्ण सहकार्य असेल, अशी ग्वाही देत असल्याचे पत्र संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना लिहले आहे.
हे ही वाचा : अफजलखानच्या कबरीजवळचा परिसर 3 दशकांमध्ये कसा बदलला? पाहा Video
संभाजीराजे काय म्हणाले, स्वराज्यावर चालून आलेला आदिलशाही सरदार अफझलखानाला महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला ठार मारला. मरणानंतर वर संपते, या भावनेने महाराजांनी त्याच ठिकाणी विधीवत दफन करून खानाची कबर बांधली, असे इतिहासकारांचे मत आहे. परंतु अलीकडच्या काळात काही लोकांनी अफझलखानाचे उदात्तीकरण करत या कबरीवर अतिक्रमण करून सरकारी जमिनीवर ताबा मिळवला होता.
..या धाडसी निर्णयामुळे आता शिवभक्तांच्या सरकारकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. केवळ इतक्यावरच न थांबत राज्यातील प्रत्येक किल्ल्यावर झालेली अशी अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे सरकारने धडक मोहीम उघडून जमीनदोस्त करावीत. या मोहिमेत आमचे पूर्ण सहकार्य असेल, अशी ग्वाही देतो..@mieknathshinde pic.twitter.com/veO6V9DpIh
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) November 11, 2022
न्यायालयाने अनेकवेळा आदेश देऊन सुध्दा हे अतिक्रमण काढण्याचे धाडस आजपर्यंतच्या कोणत्याच सरकारने दाखवले नव्हते. परंतु काल शिवप्रताप दिनाचे औचित्य साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार धडक कारवाई करत खानाच्या कबरीवरील अतिक्रमण काढण्यात आले. त्यांच्या या धाडसी निर्णयाचे कौतुक करावे तितके थोडे असल्याचे संभाजीराजे म्हणाले.
सरकारच्या या कार्यवाहीने एक चांगली सुरुवात झालेली आहे. केवळ प्रतापगडच नव्हे तर शिवरायांच्या अनेक किल्ल्यांना या अतिक्रमणाच्या व्याधीने ग्रासलेले आहे. विशाळगड हे त्याचे सर्वांत मोठे उदाहरण आहे. मात्र लोहगड, मलंगगड, चंदन वंदन सारख्या अनेक किल्ल्यांवर देखील अलीकडच्या काळात ही व्याधी जडत चाललेली आहे. यंत्रणांच्या हेतुपरस्पर डोळेझाकीमुळे या गडकोटांच्या गौरवशाली इतिहासावर आघात घातला जातो आहे.
हे ही वाचा : फडणवीसांच्या ह्रदयात हिंदुत्व, आता तुम्ही झोपेत असताना कबरही…., नितेश राणेंचा ठाकरे गटावर पुन्हा हल्लाबोल
काही महिन्यांपूर्वी रायगडावर दर्गा उभारण्याचा प्रकार शिवभक्तांच्या पाठिंब्याने आम्ही हाणून पाडला होता. आम्हाला रायगडावर जगदीश्वराच्या मंदिराची साधी डागडुजी करायची असली तरी परवानग्या आणायला दिल्लीत पन्नास बैठका घ्याव्या लागतात आणि इतके करूनही परवानगी मिळत तर नाहीच. मात्र इतरांना हे नियम लागू होत नाहीत का? ही मुजोरी मोडून काढण्याच्या दिशेने सरकारने पहिले पाऊल टाकले आहे, याबद्दल सर्व शिवभक्तांच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे अभिनंदन !
या धाडसी निर्णयामुळे आता शिवभक्तांच्या सरकारकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. केवळ इतक्यावरच न थांबत राज्यातील प्रत्येक किल्ल्यावर झालेली अशी अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे सरकारने धडक मोहीम उघडून जमीनदोस्त करावीत. या मोहिमेत आमचे पूर्ण सहकार्य असेल, अशी ग्वाही देतो…