जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'संजय राऊतांना मातोश्रीने बाजुला करावं, अजूनही शिवसेना एकत्र येऊ शकते', विजय शिवतारेंचं मोठं विधान

'संजय राऊतांना मातोश्रीने बाजुला करावं, अजूनही शिवसेना एकत्र येऊ शकते', विजय शिवतारेंचं मोठं विधान

'संजय राऊतांना मातोश्रीने बाजुला करावं, अजूनही शिवसेना एकत्र येऊ शकते', विजय शिवतारेंचं मोठं विधान

बंडखोर आमदारांनी अजूनही उद्धव ठाकरे यांच्यावर टोकाची टीका केलेली नाही. याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असताना शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी मोठं विधान केलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 9 जुलै : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknat Shinde) यांच्या गटाविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून सडकून टीका केली जात आहे. विशेष म्हणजे संजय राऊत प्रचंड टीका करत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांच्या मनात संजय राऊत यांच्याबद्दलची प्रतिमा चांगली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांनी पुकारलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं आहे. त्यामुळे मुख्य शिवसेनेत असलेल्या आमदार-खासदार आणि नेत्यांमध्ये बंडखोरांविरोधात रोष आहे. दुसरीकडे बंडखोरांच्या गोटातील आमदारांचा संजय राऊत यांच्याविरोधात रोष आहे. विशेष म्हणजे एवढं सारं होऊनही बंडखोर आमदारांनी अजूनही उद्धव ठाकरे यांच्यावर टोकाची टीका केलेली नाही. याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असताना शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांनी शिवसेना पुन्हा एक होऊ शकते. पण त्यासाठी उद्धव ठाकरेंनी एक महत्त्वाचं पाऊल उचलण्याची सूचना विजय शिवतारे यांनी दिली. उद्धव ठाकरे यांनी ठरवलं तर अजूनही शिवसेना पुन्हा एक होऊ शकते. मातोश्रीने फक्त संजय राऊतांसारख्यांना बाजुला केलं पाहिजे, असं मोठं विधान विजय शिवतारे यांनी केलं आहे. विशेष म्हणचे शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांपैकी फक्त शिवतारेच नाही तर अनेक आमदारांनी आतापर्यंत याबाबत भाष्य केलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून वारंवार ठाकरे कुटुंबावर गंभीर आरोप आणि टीका करण्यात आली आहे. या मुद्द्यावरुन शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी मोठा इशारा दिला आहे. ठाकरे कुटुंबावरील टीका आम्ही खपवून घेणार नाही हे किरीट सोमय्या यांनी लक्षात ठेवावं. अन्यथा आम्हाला सत्तेची देखील पर्वा करणार नाही, असं विधान संजय गायकवाडांनी नुकतंच केलं होतं. त्यानंतर आता शिवतारे यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. त्यामुळे बंडखोर आमदार पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात एकत्र येतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ‘उद्धव ठाकरेंनी बोलावलं तर नक्की जाऊ…’ या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंमध्ये सामंजस्य होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ता दीपक केसरकर म्हणाले की, उद्धव ठाकरे भेटणार असतील तर आम्ही मातोश्रीला नक्की जाऊ. मात्र आम्ही थेट उद्धव ठाकरेंना भेटू. मात्र यादरम्यान त्यांनी आजूबाजूच्या लोकांना बाहेर ठेवायला हवं. अशावेळी केसरकरांचा निशाणा हा संजय राऊतांवर असल्याचं मानलं जातं. ( मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंसमोरील पहिलं आव्हान; ठिकाण कोल्हापूर अन् तारीख 13 जुलै! ) याशिवाय शिंदे गटाचे आणखी एक आमदार सुहास कांदे यांनी सांगितलं की, जर उद्धव ठाकरेंनी बोलावलं तर ते चर्चेसाठी मातोश्रीवर नक्की जातील. आमची इच्छा आहे की, उद्धव ठाकरेंनी आम्हाला बोलावावं आणि आम्ही त्यांना भेटायला जाऊ. जर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना बोलावलं तर सर्वजण एकत्र मातोश्रीवर जाऊ. ठाकरे गटातही असेच प्रयत्न सुरू आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे यांनी नुकत्याच मुंबईत बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीत एका ज्येष्ठ नेत्याने पक्षाच्या हितासाठी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटाशी समेट करण्याची सूचना केली होती. मात्र ठाकरे यांची प्रतिक्रिया अद्याप कळू शकलेली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात