मुंबई, 14 जुलै: राज्यात शिवसेना (Shiv sena), काँग्रेस, (Congress )राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party)या तिन्ही पक्षांची महाविकास आघाडी (mva governmet)सत्तेत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण ढवळलं दिसून येत आहे. त्यातच काँग्रेसच्या नाना पटोले (Nana patole) यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर एकच खळबळ उडाली. अशातच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray) यांनी मंगळवारी एक मोठं विधान केलं आहे. राजकीयदृष्ट्या मी मित्रपक्ष कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधात असल्याचं मोठं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
महाराष्ट्रातील तीन पक्षांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारमध्ये ठाकरे यांच्या पक्षाबरोबर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आहे.
Politically, I have been against Congress and NCP (Nationalist Congress Party) but this doesn't mean that I will call out their good work in the Govt, wrong. Neither I nor Balasaheb have thought this: Maharashtra CM Uddhav Thackeray (13.07) pic.twitter.com/zmHRvsInJW
— ANI (@ANI) July 13, 2021
राजकीयदृष्ट्या मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याविरोधात आहे. मात्र त्याचा असा अर्थ असा नाही की मी त्यांनी सरकारमध्ये केलेल्या चांगल्या कामांची निंदा करेन, नाही. ते चुकीचं ठरेल. मी आणि बाळासाहेबांनी असा कधीच विचार केला नाही, असं मुख्यमंत्री म्हणालेत.
मुख्यमंत्र्यांचा पटोलेंना खोचक टोला
'कोरोनाची भीती बाळगू नका, बाळासाहेब, आम्हीही स्वबळावर येऊ, स्वबळावर म्हणजे चालत येऊ' असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांनी पहिल्यांदाच काँग्रेसच्या स्वबळावर भाष्य केलं. मुख्यमंत्र्यांच्या टोलेबाजीमुळे सभागृहात एकच हशा पिकली.
'माझी कारकिर्द सर्वांसमोर आहे. विरोधक यांनी जे केलं ते सर्वच वाईट अशी माझी भूमिका कधी नव्हती. पण, या काळात अनेक शोध लागत आहेत, पण पाण्याचा शोध नाही लागला. जे पाणी आहे ते नियोजन महत्त्वाचे आहे. प्रत्येक मंत्र्यांनी जनतेला काही ना काही दिलं पाहिजे, 25 वर्षानंतर महाविकास आघाडीचे नाव लक्षात राहिलं पाहिजे', असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व मंत्र्यांना दिला.
हेही वाचा- भारतीय सैन्याला मोठं यश, लष्कर ए-तौयबाचा कमांडरसह तीन दहशतवादी ठार
तसंच, स्वबळाच्या नारेबाजीवरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व्यासपीठावरून टोला लगावला. 'आता जेवणाचा विषय निघाला चांगलं झालं, कोरोनाची भीती बाळगू नका बाळासाहेब, आम्ही सुद्धा स्वबळावर येणार, स्वबळावर म्हणजे आम्ही स्वतः चालत येऊ, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाहत नाना पटोले यांना टोला लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Congress, NCP, Shiv sena, Uddhav tahckeray