जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Cyrus Mistry Death : सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर आणखी एक मन पिळवटून टाकणारी मोठी बातमी समोर

Cyrus Mistry Death : सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर आणखी एक मन पिळवटून टाकणारी मोठी बातमी समोर

Cyrus Mistry

Cyrus Mistry

देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतींमध्ये एक असलेले आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं आज अपघाती निधन झालं. त्यांच्या निधनामुळे देशाची खूप मोठी हानी झाली आहे. त्यांच्या निधनाच्या बातमी नंतर आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

पालघर, 4 सप्टेंबर : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि देशाचे मोठे उद्योगपती सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झालं आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघर जिल्ह्यातील सूर्या नदीच्या पुलावर भीषण अपघात झाला. सायरस यांची मर्सिडीज कार रस्ता दुभाजकाला (डिव्हायडर) धडकल्याने मोठा अपघात घडला. या अपघातात सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. तर गाडीतील इतर तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली होती. जखमींना गुजरात येथील एका रुग्णालयात दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. पण नुकतीच समोर आलेल्या माहितीनुसार जखमींपैकी आणखी एका जणाचा मृत्यू झाल्याची दुखद घटना समोर आली आहे. या घटनेमुळे देशाची प्रचंड मोठी हानी झाली आहे. या अपघाताच्या घटनेवर देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सायरस मिस्त्री त्यांच्या महागड्या मर्सिडीज कारने प्रवास करत होते. कारमध्ये ड्रायव्हरसह तीन जण असे एकूण चार जण होते. यामध्ये स्वत: सायरस मिस्त्री, जहांगीर दिनशा पंडोले, अनायता पंडोले (महिला), दरीयस पांडोले यांचा समावेश होता. अपघातात सायसर मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर इतर तीनही जण गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण जखमींपैकी एक असलेल्या जहांगीर दिनशा पंडोल यांचादेखील उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं वृत्त समोर येत आहे. ( टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू; भयंकर अपघाताचा पहिला Video आला समोर ) पालघर जिल्ह्यात सूर्या नदीच्या पुलावरुन गाडी जात होती. यावेळी चारोटी गावाजवळ पूलावर गाडीची डिव्हायडरला जोराची धडक बसली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीचा वेग जास्त होता. त्यामुळे गाडीवर चालकाचं नियंत्रण राहिलं नाही. यावेळी गाडीची डिव्हायडरला जोरदार धडक बसली. ही धडक अत्यंत भयानक होती. या धडकमुळे मर्सिडीज कारचा पुढचा भाग चक्काचूर झाला आणि गाडीत असलेले उद्योगपती सायरस मिस्त्री यांचं निधन झालं. सायरस मिस्त्री यांच्याविषयी माहिती सायरस मिस्त्री हे व्यावसायिक जगतात सामान्य नाव नाही. ते प्रसिद्ध भारतीय वंशाचे खरबापती पलोनजी शापूरजी मिस्त्री यांचे धाकटे पुत्र आहेत. सायरस मिस्त्री यांचा जन्म 4 जुलै 1968 रोजी मुंबईत झाला. 1992 मध्ये सायरस मिस्त्री यांनी भारतातील आघाडीच्या वकीलांपैकी एक असलेल्या इक्बाल छागला यांची मुलगी रोहिका छागला हिच्याशी विवाह केला. त्यांना दोन मुलगे आहेत. सायरस मिस्त्री यांनी त्यांचे प्रारंभिक शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल आणि एंड जॉन कॉनन स्कूलमधून केले. त्यानंतर ते सिव्हिल इंजिनीअरिंगसाठी लंडनला गेले. त्यांनी लंडन बिझनेस स्कूलमधून (व्यवस्थापन) पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्याच्याकडेही वडिलांप्रमाणे आयरिश नागरिकत्व आहे. सायरस मिस्त्री यांनी 1991 मध्ये त्यांच्या वडिलांच्या व्यवसाय पालोनजी शापूरजी ग्रुपमध्ये काम करण्यास सुरुवात केली. 1994 मध्ये शापूरजी पालोनजी ग्रुपचे संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. आपल्या वडिलांप्रमाणे, सायरस मिस्त्री यांनी भारतात अनेक मोठे विक्रम प्रस्थापित केले, ज्यात सर्वात उंच निवासी टॉवर बांधणे, सर्वात लांब रेल्वे पूल बांधणे आणि सर्वात मोठे बंदर बांधणे. पालोनजी मिस्त्री ग्रुपचा व्यवसाय कापडापासून रिअल इस्टेट, हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस ऑटोमेशनपर्यंत पसरलेला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात