जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / लॉकडाऊनचा बळी! उपासमारीची वेळ आलेल्या ST कर्मचाऱ्यानं पत्नीच्या साडीनं लावला गळफास

लॉकडाऊनचा बळी! उपासमारीची वेळ आलेल्या ST कर्मचाऱ्यानं पत्नीच्या साडीनं लावला गळफास

यात मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणाऱ्यांमध्ये वृद्धांची संख्या सातत्यानं वाढत आहे. त्याचबरोबर महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्येही आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे ही एक भारतीयांसाठी चिंतेची बाब आहे.

यात मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणाऱ्यांमध्ये वृद्धांची संख्या सातत्यानं वाढत आहे. त्याचबरोबर महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्येही आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे ही एक भारतीयांसाठी चिंतेची बाब आहे.

राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊननं आणखी एक बळी घेतला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

सांगली, 31 जुलै: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊननं आणखी एक बळी घेतला आहे. एका एसटी कर्मचाऱ्यानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अमोल धोंडीराम माळी (वय-35) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. पेठ येथे गुरुवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. अमोल माळी हे इस्लामपूर (ता. सांगली) आगारात मॅकॅनिक होते. एसटी बस सेवा बंद असल्यामुळे अमोल याचा दोन महिन्यांपासून पगार झाला नाही. त्यामुळे ते आर्थिक संकटात सापडले होते. यामुळे अमोल यांनी आत्महत्ये सारखं टोकाच पाऊल उचलत राहत्या घरी पत्नीच्या साडीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. हेही वाचा.. महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे टिकेल का? यावर काय म्हणाले रोहित पवार मिळालेली माहिती असी की, अमोल माळी याच्या पगारावरच कुटुंबाचा उदर्निवाह सुरु होता. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून पगार न मिळाल्यानं ते आणि पत्नी इतर ठिकाणी मजुरी करुन घर खर्च चालवत होते. याच नैराश्येतून अमोल यांनी आपली जीवन प्रवास संपवलं. अमोल यांच्या पश्चात आई, पत्नी, 5 वर्षांचा मुलगा, 3 वर्षांची मुलगी असा परिवार आहे. राज्यात कोरोनाचं संकट कोसळलं आहे. परिणामी राज्यातील लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे चांगल्या चांगल्यांचं कंबरडं मोडलं आहे. आर्थिक घडी विस्कटली आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. जिल्हाअंतर्गतही एसटीची सेवा बंद आहे. गेले चार महिने एसटी बंद असल्याने अनेक कर्मचाऱ्यांचे पगारही झालेले नाहीत. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊन काळात एसटी आगार चार महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगारही झालेले नाहीत. त्यामुळे हजारो एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. 2019 च्या भरतीमधली ही सेवा स्थगित…. दुसरीकडे, एसटी महामंडळानं गेल्या आठवड्यात एक पत्रक जारी केलं आहे. एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयातून कर्मचारी सेवा खंडीत करण्याबाबतचं पत्रक विभागीय कार्यालयांना पाठवण्यात आलं आहे. 2019 च्या भरतीमधली ही सेवा स्थगित करण्यात आली आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे एसटी बंद असल्याने उत्पन्न ठप्प झालं आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. हेही वाचा… महावितरणचा भोंगळ कारभार! शेतात गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा शॉक लागून जागेवरच मृत्यू सरळसेवा 2019 मध्ये भरती झालेले चालक-वाहक यांची सेवा तात्पुरती खंडित करावी, भविष्यात गरज असेल तर ज्येष्ठतेनुसार पुन्हा सेवेत घ्यावे, चालक-वाहक, सहाय्यक, लिपिक, टंकलेखक, अन्य अधिकारी किंवा अनुकंपा तत्वावरील जे उमेदवार प्रशिक्षण घेत असतील, त्याचे प्रशिक्षण थांबवावे, कोरोना संकट टळल्यानंतर पुढील परिस्थिती पाहून या कर्मचाऱ्यांना पुन्हा ज्येष्ठतेनुसार सेवेत घेतलं जाईल, असही पत्रकात म्हटलं आहे. जवळपास 8500 वाहक, चालकांसह इतर कर्मचाऱ्यांची सेवा खंडीत करण्यात आली आहे. ज्या कर्मचाऱ्यांच प्रशिक्षण सुरु आहे, अशांना थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: sangli , st bus
  • First Published :
जाहिरात
जाहिरात