दुसरीकडे, यूजीसीने घेतलेल्या निर्णयासंदर्भातील आपल्या शेवटच्या ट्वीटमध्ये भाजप आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. हेही वाचा...ही चिपळ्या वाजवायची वेळ आहे का? सेनेचा फडणवीसांना सणसणीत टोला आशिष शेलार म्हणाले, राज्य सरकार एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना नापास करणार होते? ते सुदैवाने आता बचावले. आधी घोषणा, मग निर्णय, मग गृहपाठ यामुळे जो विद्यार्थ्यांना गेले तीन महिने मनस्ताप झाला. त्यामुळे विद्यार्थी भयभीत आहेत त्यांना संभ्रमातून बाहेर काढा. आता तरी सु-सूत्रे योग्य नियोजन करा, असा सल्ला देखील आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.कुणाला किती वेळा, कुठे भेटावे?हा विषय त्यांचा असला तरी... आपण ज्या व्यक्तीला वारंवार बोलावून घेतो किंवा यायला लावतो...त्या व्यक्तीचे ज्येष्ठत्व, कर्तुत्व, सामाजिक स्थान आणि त्या व्यक्तीच्या प्रकृतीची काळजी याचे भान ठेवावेच लागते! इथे याबाबत "आनंदीआनंदच" आहे!
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 8, 2020
राज्य सरकार एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना नापास करणार होते? ते सुदैवाने आता बचावले. आधी घोषणा, मग निर्णय, मग गृहपाठ यामुळे जो विद्यार्थ्यांना गेले तीन महिने मनस्ताप झाला. विद्यार्थी भयभीत आहेत त्यांना संभ्रमातून बाहेर काढा... आता तरी सु-सूत्रे योग्य नियोजन करा!! (3/3)
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 7, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ashish shelar, Sharad pawar, Udhav thackeray