या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी दिलेल्या निकालात त्यांनी म्हटलंय, ‘विशिष्ट समाजाची किंवा जातीची प्रतिष्ठा किंवा विशिष्ट विचारसरणीवर श्रद्धा असणं ही कारणं कोणत्याही प्रौढ व्यक्तीच्या स्वत: चा वैवाहिक जोडीदार निवडायच्या निर्णयामध्ये बाधा ठरता कामा नये. जातीव्यवस्थेचं उच्चाटन करण्याबाबत घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की, जातीव्यवस्थेचं उच्चाटन करायचं असेल तर आंतर-जातीय, आंतर-धर्मिय विवाह करणं हेच त्यावरचं सर्वोत्तम उत्तर आहे यावर माझा आता विश्वास बसला आहे. रक्ताचा मिलाफ झाल्यामुळेच हे आपले सगेसोयरे, नातेवाईक आहेत अशी भावना माणसाच्या मनात उत्पन्न होऊ शकते आणि ही भावना जोपर्यंत समाजात दृढमूल होत नाही तोपर्यंत जातीव्यवस्थेमुळे निर्माण झालेली आपण हीन किंवा वेगळे असल्याची भावना समाजात राहणार ती जाऊच शकणार नाही. ’ हे देखील वाचा - आता इंटरनेटवर पॉर्न सर्च केलं तर खैर नाही, थेट पोलिसांना जाणार मेसेज!
हा दाखला दिल्यानंतर ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यातही त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की कदाचित आंतर-विवाहांमुळे भविष्यात जाती आणि समाजांतील ताणतणाव कमी होतीलही पण तोपर्यंत या तरुणांना घरातील वडिलधाऱ्यांच्या धमक्यांचा सामना करावा लागेल आणि न्यायालयं या तरुणांच्या मदतीला धावून येतील. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या तपास अधिकाऱ्याच्या दृष्टिकोनावरही न्यायालयाने कटाक्ष टाकला. जर ही मुलगी कर्नाटकात परतली नाही तर पोलीस तिथं येऊन तिच्या नवऱ्याविरुद्ध अपहरणाचा खटला दाखल करतील असं तपास अधिकाऱ्याने मुलीला सांगितलं होतं. त्यावर न्यायालयाने म्हटलं की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणातील तपास अधिकाऱ्याचं काउन्सिलिंग करावं आणि अशी संवेदनशील प्रकरणं कशी हाताळावी याबाबत पोलिसांना प्रशिक्षण द्यावं.मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Love story, Marriage, Supreme court, Valentine day