जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / नातं अधिक घट्ट करण्यासाठी अशी द्या भावनेला बुद्धीची जोड, फॉलो करा या सिम्पल टिप्स

नातं अधिक घट्ट करण्यासाठी अशी द्या भावनेला बुद्धीची जोड, फॉलो करा या सिम्पल टिप्स

Photo Credit : Canva

Photo Credit : Canva

कोणतेही नाते अधिक चांगले आणि सुंदर करण्यासाठी भावनिकदृष्ट्या बुद्धिमान असणे म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्स सर्वात महत्त्वाचे आहे. याद्वारे केवळ भावनांवर नियंत्रण ठेवता येत नाही तर मानसिक तणावही कमी करता येतो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 25 सप्टेंबर : क्वचितच अशी व्यक्ती असेल ज्याला भावना नसतील. जीवनात भावनांची काळजी घेतली जाते, आनंदाने जगण्यासाठी लहान लहान कारणही खूप महत्वाचे असते. अशा परिस्थितीत प्रत्येकाने भावनिक बुद्धिमत्ता म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्स सुधारले पाहिजे. या अशा भावना आहेत ज्यावर संपूर्ण जग अवलंबून आहे. मग ते चांगले असो वा वाईट, काही फरक पडत नाही. प्रत्येकाचे स्वतःचे वेगळे अर्थ आहेत. जर आपण इमोशनल इंटेलिजन्सला आपल्या नात्यांसोबत जोडले तर याचे आपल्या आयुष्यावर खूप सकारात्मक परिणाम होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, इमोशनल इंटेलिजन्स कोणतेही नाते आणखी चांगले बनवू शकते. म्हणूनच आज आम्ही इमोशनल इंटेलिजन्स सुधारण्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत. यानुसार जर तुम्ही तुमच्या इमोशनल इंटेलिजन्सवर काम केले तर तुमचं नातंही आणखी सुंदर आणि आनंदी होईल.

सोशल मीडियाचा अतिरेक मानसिक आरोग्यासाठी ‘स्लो पॉयझन’, संशोधनात मोठा खुलासा

फॉलो करा या सिम्पल टिप्स बोलण्याची पद्धत Inc.com च्या मते, बोलण्याची योग्य आणि चांगली पद्धत आदरयुक्त वाटते आणि नातेसंबंध मजबूतही करते. अशा प्रकारचे इमोशनल इंटेलिजन्स असणे अत्यंत आवश्यक आहे. प्रतिसाद द्यायला शिका जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीचे कोणाशी भांडण होते तेव्हा त्याला खूप राग येतो, ही एक सामान्य गोष्ट आहे. मात्र इमोशनली इंटेलिजंट असलेल्या व्यक्तीला अशा परिस्थितीत शांत कसे राहायचे हे माहित असते. कारण रागाच्या भरात कोणताही निर्णय घेतल्याने नातेसंबंध बिघडू शकतात.

News18लोकमत
News18लोकमत

ऐकण्याची क्षमता वाढवणे बोलण्यापूर्वी आपली वेळ येण्याची वाट पाहणे आणि संपूर्ण ऐकल्यानंतरच बोलणे हा इमोशनल इंटेलिजन्सचा सर्वात मोठा गुण आहे. कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देण्यापूर्वी समोरच्याला काय म्हणायचे आहे हे जाणून घेतले पाहिजे आणि समजून घेतले पाहिजे. प्रेरित रहा भावनिकदृष्ट्या बुद्धिमान लोक म्हणजेच इमोशनली इंटेलिजंट लोक खूप प्रेरित असतात. ते ध्येय निश्चित करतात आणि आव्हानांना तोंड देतात. नाते घट्ट ठेवण्यासाठी हा गुण असणे सर्वात महत्त्वाचे असते. जेवण केल्यानंतर लगेच अंघोळ करणे योग्य आहे का? पाहा आरोग्यावर कसा होतो परिणाम सकारात्मक राहा नातेसंबंधांमध्ये सकारात्मक राहणे महत्वाचे आहे, तरच ते दीर्घकाळ टिकू शकतात. नकारात्मक वृत्ती नाती बिघडवते. भावनिकदृष्ट्या बुद्धिमान लोक देखील इतरांबद्दल विचार करतात आणि त्यांचा दृष्टिकोन समजून घेतात. अशा प्रकारे, कोणतीही व्यक्ती कोणतेही नाते सुधारण्यासाठी आपली भावनिक बुद्धिमत्ता वाढवू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात