मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Relationship Tips : बालपणीच्या कडू आठवणींचा आपल्या नात्यावर परिणाम होतो का? वाचून वाटेल आश्चर्य

Relationship Tips : बालपणीच्या कडू आठवणींचा आपल्या नात्यावर परिणाम होतो का? वाचून वाटेल आश्चर्य

अनेक वेळा एखादी व्यक्ती आपले चांगले नातेसंबंध सांभाळू शकत नाही आणि स्वतःलाच नाते तुटण्याचे कारण समजते. खरं तर काही वेळा बालपणीच्या काही कडू आठवणी माणसाच्या मनात इतक्या खोलवर की, त्या व्यक्तीला सतत असुरक्षित वाटते. याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.

अनेक वेळा एखादी व्यक्ती आपले चांगले नातेसंबंध सांभाळू शकत नाही आणि स्वतःलाच नाते तुटण्याचे कारण समजते. खरं तर काही वेळा बालपणीच्या काही कडू आठवणी माणसाच्या मनात इतक्या खोलवर की, त्या व्यक्तीला सतत असुरक्षित वाटते. याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.

अनेक वेळा एखादी व्यक्ती आपले चांगले नातेसंबंध सांभाळू शकत नाही आणि स्वतःलाच नाते तुटण्याचे कारण समजते. खरं तर काही वेळा बालपणीच्या काही कडू आठवणी माणसाच्या मनात इतक्या खोलवर की, त्या व्यक्तीला सतत असुरक्षित वाटते. याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 22 मार्च : कोणतंही नातं बनवण्याचं आणि तुटण्यामागचं एक प्रमुख कारण म्हणजे लहानपणीच्या वाईट आठवणी, अपघात किंवा एखाद्या व्यक्तीचे वाईट अनुभव. लहानपणी मनावर झालेला आघात माणसाच्या नात्यावर अनेक प्रकारे परिणाम करतो. मानसशास्त्रज्ञ आणि नातेसंबंध समुपदेशक ल्युसिल शॅक्लेटन म्हणतात की मूल जसजसे मोठे होत जाते आणि या गोष्टींना सामोरे जाण्यास शिकते. तेव्हा ते नातेसंबंधात जातात तेव्हा त्यांना अनेक प्रकारच्या असुरक्षिततेचा अनुभव येतो. अशावेळी परिस्थिती सुधारण्यासाठी वैद्यकीय शास्त्रामध्ये अनेक मार्ग आहेत आणि समुपदेशन, मेडिटेशन, ग्राउंडिंग व्यायामाच्या मदतीने त्यावर मात करता येते आणि ते चांगले नातेसंबंध अनुभवण्यास सक्षम असतात. बालपणातील आघात प्रौढ नातेसंबंधांवर किती परिणाम करतात हे आम्ही येथे सांगत आहोत.

बालपणातील आघातांमुळे नातेसंबंधांवर होतात हे परिणाम

विश्वासाचा अभाव

जेव्हा एखादी व्यक्ती लहानपणी अशा काही घटनांमधून जाते. ज्यामध्ये त्याच्या आपल्या लोकांनीच विश्वासघात केला असेल किंवा आपला विश्वास तोडला असेल, तेव्हा त्याला आयुष्यभर आपल्या प्रियजनांवर विश्वास ठेवण्यास अडचणीचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत त्याला नात्यात कधीच सुरक्षित वाटत नाही.

नुसतं एकदा बघितलं तरी मनात काय होतं अन् काय नाय! प्रेमात पडलोय हे कसं ओळखायचं माहितीये का?

संवादात अडचणी

बालपणात जेव्हा मुलांना चांगल्या पद्धतीने संवाद साधण्याचे स्वातंत्र्य दिले जात नाही किंवा सर्वकाही शांतपणे सहन करण्यास शिकवले जाते. तेव्हा त्यांना प्रत्येक भावना व्यक्त करण्यात अडचणी येऊ लागतात. त्यामुळे एखादी व्यक्ती आपल्या प्रियजनांसोबतही आपल्या भावना शेअर करू शकत नाही.

ताण

जर एखादी व्यक्ती लहानपणापासून तणावाखाली असेल. तर जेव्हा ती व्यक्ती मोठी होतो तेव्हा तणाव त्याच्यासाठी ट्रिगर म्हणून काम करतो आणि तो नात्यातील सर्व प्रकारचे तणाव टाळण्याचा प्रयत्न करतो.

रीऍक्टिव्ह होणे

अनेक वेळा एखादी व्यक्ती अशा गोष्टींवर प्रतिक्रिया देऊ लागते ज्या इतर लोकांना समजतही नाहीत. अशा परिस्थितीत जोडीदारासाठी कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकते.

आपुलकीचा अभाव

बालपणातील अनुभवामुळे अनेक वेळा माणसाला कोणाशीही लवकर जुळवून घेता येत नाही आणि कोणाबद्दलही त्याच्या मनात प्रेम, आसक्ती निर्माण होत नाही. अशा परिस्थितीत रिलेशनशिपमध्ये राहाणे त्याच्यासाठी कठीण काम असू शकते.

ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा

स्वत:ला नुकसान पोहोचवणे

बालपणातील अनुभवांचे हेदेखील एक कारण आहे. ज्यामध्ये एखादी व्यक्ती एखाद्या नात्यातल्या एखाद्या गोष्टीवर स्वतःला किंवा त्याच्या नात्याला इजा करण्याचा प्रयत्न करत राहते. जर तुम्हाला असा काही अनुभव आला तर समुपदेशनाच्या मदतीने तुम्ही तुमचे नाते सुधारू शकता आणि बालपणीच्या वाईट आठवणी दूर करू शकता.

First published:
top videos

    Tags: Health Tips, Lifestyle, Relationship tips