मुंबई, 25 मे: झी मराठीवरील ( Zee Marathi) ‘माझी तुझी रेशीगाठ’ (Mazhi Tuzhi Reshimgath ) मालिकेत यश (Yash) आणि नेह (Neha) एकत्र आले असून नेहा कंपनीच्या कामानिमित्त विदेशात गेली आहे. नेहा इथे नसताना चौधरीच्या घरात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. आजोबांनी विल बनवल्यापासून घरातील सगळेच हैराण झाले आहे. नेहाच्या हातात महत्त्वाचे निर्णय घेण्याचे सर्व अधिकार दिल्याने घरातील सर्व नाराज झाले आहेत. तर दुसरीकडे परी ही नेहाचीच मुलगी असल्याचं सत्य यशने आजोबांपासून लपवल्याने आणखी वेगळा गोंधळ निर्माण झाला आहे. परी आणि आजोबांमध्ये प्रेमाचं अनोखं नातं निर्माण झालं आहे. परंतू परी ही अनाथ असल्याचं आजोबांना सांगण्यात आलं आहे. या गोंधळामुळे यश देखील टेन्शनमध्ये आलाय. मागच्याच भागात नेहा भारतात परतली आहे. परंतू नेहा परत येताच तिला मोठा धक्का लागणार आहे. कारण परीच्या आईचं म्हणजेच नेहाचं परीची आई असल्याचं सत्य आजोबांसमोर येणार आहे. हेही वाचा - MahaMinister: आदेश भावोजींचं रत्नागिरीत दणक्यात स्वागत! वहिनींसोबत काढले सेल्फी
माझी तुझी रेशीमगाठ मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला असून ज्यात यश परी ही नेहाचीच मुलगी असल्याचं आजोबांना सांगतो. मालिकेच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आल्याप्रमाणे, नेहा कंपनीचं काम आटोपून भारतात येते. चौधरींच्या घरात नेहाचं स्वागत करण्यात येतं. नेहा आल्याने आजोबा देखील खुश असून घरी आलेली परी अनाथ समजून आजोबा तिला दत्तक घेण्याचा निर्णय सर्वांना सांगतात. हा निर्णय ऐकून नेहाला जबरदस्त धक्का बसतो आणि खाली कोसळते. नेहाला अशा परिस्थित पाहून आजोबा हा सगळा काय प्रकार असल्याचं विचारता. त्यावर यश त्यांना परी अनाथ नसून तिचे आई वडिल जिवंत असून नेहा परीची खरी आई असल्याचं सांगतात. परीच्या आईचं सत्य ऐकून आजोबांना देखील धक्का बसतो. परीच्या आईचं सत्य समोर आल्याने मालिका आता नव्या वळणार येऊन ठेपली आहे. नेहा आणि यश यांच्या प्रेमकहाणीत खडा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मालिकेचे आगामी भाग पाहणे अत्यंत महात्त्वाचे ठरणार आहेत. आजोबांना परीचं सत्य कळल्यानंतर त्यांनी नेहाला दिलेले हक्क ते तिच्यापासून काढून घेणार का? यश आणि नेहा यांच्या लग्नाला आजोबा नकार देणार का? असे अनेक प्रश्न सर्वांना पडले आहेत. तर दुसरीकडे यशने आपल्यापासून इतक्या गोष्टी लपवून ठेवल्याने नेहाला देखील धक्का बसला आहे. ज्या माणसावर आपण विश्वास ठेवून परीला त्यांच्या घरी ठेवलं त्या घरात ती अनाथ म्हणून राहत असल्याचं कळल्यानंतर नेहाला मोठा धक्का बसला आहे. यश आपल्याशी खोटं बोलल्याने नेहा दुखावली आहे. त्यामुळे यशबरोबर लग्न करण्यासाठी नेहा तयार होणार का ? असा प्रश्न देखील समोर आला आहे. त्यामुळे मालिकेच्या येत्या भागात काय घडणार हे पाहणे महत्त्वाचं ठरेल.

)







