जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Vivek Oberoi : ऐश्वर्या सोबतच्या नात्यावर अखेर विवेक ओबेरॉयनं सोडलं मौन; म्हणाला, 'तो काळ आयुष्यातील सर्वात...'

Vivek Oberoi : ऐश्वर्या सोबतच्या नात्यावर अखेर विवेक ओबेरॉयनं सोडलं मौन; म्हणाला, 'तो काळ आयुष्यातील सर्वात...'

विवेक ओबेरॉय

विवेक ओबेरॉय

एकेकाळी विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय यांच्या लिंकअपच्या बातम्या खूप चर्चेत होत्या. दोघांचे ब्रेकअप झाले. दरम्यान आता अभिनेत्याने बरेच दिवसांनी याबद्दल मौन सोडलं आहे. या नात्याचा शेवट का झाला, या दोघांत नक्की काय नातं होतं याबद्दल विवेकने खुलासा केला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 16 डिसेंबर : बॉलीवूडच्या चित्रपटविश्वात नाव कमावल्यानंतर अभिनेता विवेक ओबेरॉय ने आता ओटीटी पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. वेब सीरिजच्या माध्यमातून करिअरला नवी दिशा देण्यास सुरुवात केली आहे. सध्या तो ‘धारावी बँक’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे, ज्यामध्ये अण्णा म्हणजेच सुनील शेट्टी मुख्य भूमिकेत आहेत. विवेक ओबेरॉय त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल क्वचितच बोलतो, परंतु अलीकडेच तो त्याच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्याबद्दलही बोलताना दिसला. पण, ऐश्वर्या राय बच्चनसोबतच्या त्याच्या नात्याबद्दल त्याला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने धक्कादायक खुलासा केला आहे. खरंतर, एकेकाळी विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय यांच्या लिंकअपच्या बातम्या खूप चर्चेत होत्या. सलमान खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या राय त्याला डेट करत असल्याचा खुलासा खुद्द विवेक ओबेरॉयनेच केला होता. मात्र, नंतर दोघांचे ब्रेकअप झाले. 2003 मध्येच विवेक आणि ऐश्वर्या वेगळे झाले. दरम्यान आता अभिनेत्याने बरेच दिवसांनी याबद्दल मौन सोडलं आहे. या नात्याचा शेवट का झाला, या दोघांत नक्की काय नातं होतं याबद्दल विवेकने खुलासा केला आहे. हेही वाचा - अल्लू अर्जुन ते रामचरण साऊथचे सुपरस्टार ‘या’ साईड बिझनेसद्वारे करतात कोट्यवधींची कमाई या नात्याबाबत एका मुलाखतीत विवेक ओबेरॉयला विचारण्यात आले की, ‘करिअरच्या सुरुवातीच्या काळात ऐश्वर्या रायसोबतच्या नात्याबद्दल सार्वजनिकपणे चर्चा करणे योग्य होते का?’ याला उत्तर देताना विवेकने थेट उत्तर दिले. विवेक म्हणाला कि,  ‘त्या सर्व गोष्टी घडून गेल्या आहेत, आता मी त्यावर काहीही बोलणार नाही. कारण, जर तुम्हाला तुमच्या वाटत असेल की कुणीही तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलू नये आणि तुम्ही तितके संवेदनशील असाल तर स्वतःच त्याबद्दल बोलणं टाळा.’ विवेक पुढे म्हणाला, ‘माझं जेव्हा ऐश्वर्याशी ब्रेकअप झालं, तेव्हा केवळ माझ्या वैयक्तिक आयुष्यातच नाही तर फिल्मी करिअरमध्येही खूप नुकसान झालं होतं. मी तब्बल 18 महिने रिकामा बसलो होतो. मी इतके चांगले चित्रपट देऊनही मला काम मिळत नव्हतं. माझ्या आयुष्यातील तो टप्पा इतका वाईट होता की मी डिप्रेशनमध्ये गेलो आणि आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता.

News18लोकमत
News18लोकमत

विवेक ओबेरॉय पुढे म्हणाला, तो काळ असा होता की बॉलीवूडवर फक्त ५-१० लोकांचं नियंत्रण होतं आणि जर कोणाबद्दल काही गैरसमज असेल तर त्याला काम मिळायचं नाही. पण आता ओटीटी आल्यानंतर परिस्थिती खूप बदलली आहे. खरं तर माझ्याबरोबर जे काही घडलं त्याबद्दल माझ्या मनात कटुता नाही, कारण मला पत्नी प्रियांका आणि आईचा खूप पाठिंबा आहे. विवेकने २०१० मध्ये प्रियंका अल्वाशी लग्न केलं, त्यांना दोन अपत्ये आहेत. विवेक ओबेरॉयने आपल्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले, त्यात ‘कंपनी’, ‘साथिया’, ‘शूटआउट अॅट लोखंडवाला’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. पण एक वेळ अशी आली की विवेकच्या सर्वच चित्रपटांना फटका बसू लागला, त्याची कारकीर्द संपुष्टात येऊ लागली आणि त्याला काम मिळणं अवघड झालं. बराच काळ त्याला घरीच बसून राहावं लागलं, परिणामी त्याला डिप्रेशनचा सामना करावा लागला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात