मुंबई, 27 ऑक्टोबर : ‘बिग बॉस 16’ चा मागचा आठवडा फारच रंजक होता. बिग बॉस सुरू झाल्यानंतर अलीकडेच होस्ट सलमान खानला डेंग्यू झाला, त्यामुळे त्याच्या जागी बिग बॉसच्या होस्टचं काम करण जोहरने हाताळलं. करणने सुद्धा हि कामगिरी चोख हाताळली. आता चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सलमान खान डेंग्यूतून पूर्णपणे बरा झाला असून तो लवकरच शोमध्ये परतणार आहे. या आठवड्याच्या विकेंडला सलमान खान पुन्हा शो होस्ट करताना दिसेल. पण त्यासोबतच चाहत्यांसाठी अजून एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे अभिनेत्री कतरिना कैफ ही ‘बिग बॉस’च्या घरात एंट्री घेणार आहे. अभिनेता सलमान खान या शोचा होस्ट म्हणून पुनरागमन करत आहे आणि या आठवड्यातील शोचा ‘वीकेंड का वार’ होस्ट करणार आहे. शोशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी सलमानची एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफही सलमानसोबत दिसणार आहे. विकी कौशलची पत्नी कतरिना कैफ तिचा आगामी चित्रपट फोन भूतच्या प्रमोशनमध्ये सध्या बिझी आहे. त्यामुळे ती याचसाठी कतरिना कैफ बिग बॉस 16 मध्ये पोहोचणार आहे. विशेष म्हणजे कतरीना कैफ लग्नानंतर पहिल्यांदाच सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. हेही वाचा - Bigg Boss 16: घरातील एकाही स्पर्धकाला जिंकता आला नाही कॅप्टन्सी टास्क; आता कॅप्टनशिवाय चालणार घर कतरिना कैफसोबत ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी देखील सहभागी होणार आहेत. ‘फोन भूत’ हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे त्यामुळे या चित्रपटाची कथा आणि इतर तपशील याविषयी प्रेक्षकांना बरीच माहिती असली तरी, एक मोठे कुतूहल चित्रपटातील भुताच्या पात्राबद्दल दर्शकांमध्ये होते. मात्र आता दर्शकांना या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे कारण, या चित्रपटात कतरिना कैफ एका सुंदरशा भूताच्या भूमिकेत दिसणार आहे.
आतापर्यंत आपण कतरीनाला चित्रपटांमध्ये फक्त ग्लॅमरस भूमिकेत पाहिलं असून, कतरिना पहिल्यांदाच पडद्यावर भूताच्या भूमिकेत दिसणार आहे. या दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने, कतरिनाला पडद्यावर अशा अनोख्या भूमिकेत पाहणे दर्शकांसाठी खूप रोमांचक असेल. बॉलिवूडमधील महिला सुपरस्टार्सपैकी एक, कतरिना आता भूताच्या रूपात वेगळ्या प्रकारची मोहिनी घेऊन येते आहे जी चित्रपट रसिकांसाठी नक्कीच एक पर्वणी असेल. फोन भूत हा कतरिनाचा लग्नानंतरचा पहिला चित्रपट आहे, त्यामुळे देखील रसिकांमध्ये या चित्रपटाविषयी उत्सुकता आहे. बिग बॉस 16 मध्ये प्रत्येक आठवड्यातून गोष्टी अधिक मनोरंजक होत आहेत. गेल्या एपिसोडमध्ये बिग बॉसने अर्चना गौतमला कर्णधारपदावरून हटवले होते. त्यांच्या सहकारी स्पर्धकांना एक ‘पटाखा’ असे लेबल लावण्याचे नवीन कार्यही देण्यात आले. काम अधिक मनोरंजक बनले ते म्हणजे त्यांना कारणे देखील द्यावी लागली.